क्रांतिवीर संकुलात बाल बाजार संपन्न. साडेचार लाखाची उलाढाल.

बातमी Share करा:

 म्हसवड. : (अहमद मुल्ला  )
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांच्या  वैचारिक व कलागुणांना वाव देण्यासाठीआयोजित केलेला बाल बाजार उत्साहात संपन्न झाला , या बाजारात साडेचार लाख रुपयांची  उलाढाल झाली. 
  विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारिक व आर्थिक ज्ञानाची माहिती होण्यासाठी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड मध्ये बाल बाजाराचे आयोजन केलेले होते. या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.तर समारोप म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ व सौ .निशा भुजबळ यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर,संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर,पत्रकार संघाचे नेते विजय टाकणे,अध्यक्ष सचिन मंगरुळे,एल.के सरतापे,महेश कांबळे,अहमद मुल्ला व नागनाथ डोंबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ म्हणाले बाल बाजाराच्या माध्यमातून क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाने वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवलेला आहे.त्याद्वारे संस्था व्यवस्थापनाची दूरदृष्टी दिसून येत आहे.विद्यार्थी सर्व गुण संपन्न घडवण्यासाठी व्यवस्थापनाने राबवलेला उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण असून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळणार आहे.गुणवत्ता वाढ व  उपक्रमशीलता हा क्रांतिवीर संकुलाचा आरसा असून या संकुलाला उज्वल भविष्य असल्याचे सपोनी भुजबळ यांनी स्पष्ट केले.
       यावेळी बोलताना केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार म्हणाले विद्यार्थ्यांमधील कला गुण जोपासण्यासाठी,तसेच आर्थिक व व्यवहारिक ज्ञान वाढवण्यासाठी बाल बाजार उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
    शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच व्यवहारीक कलागुणाची सांगड जोडणे गरजेचे आहे.बाल बाजाराच्या माध्यमातून व्यवहारिक आवड व विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती वाढवण्याचे काम केले जाते.संकुलातील गुणवत्ता व उपक्रमशीलता  याबद्दल केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार यांनी व्यवस्थापनाची प्रशंशा केली.
      त्यानिमित्ताने  सपोनी  राजकुमार भुजबळ यांचा वाढदिवसानिमित्त सपत्नीक  व उपस्थित मान्यवर पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला.
    बाल बाजाराच्या माध्यमातून क्रांतिवीर शैक्षणिक संकुलास  म्हसवड येथील आठवडा बाजाराचे स्वरूप प्राप्त झालेली होते. विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारचा भाजीपाला,विविध प्रकारची फळे, खाण्याचे विविध व दर्जेदार पदार्थ, जनरल स्टोअर चे साहित्य , कटलरी साहित्य , कडधान्य, चहा, कॉफी,सरबत,शालेय साहित्य तसेच अनेक शेती उत्पादने  स्टॉलच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवलेली होती.
या बाल बाजाराला पालक, शिक्षक व विद्यार्थ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या उपक्रमात क्रांतिवीर शाळेतील  550  विद्यार्थी सहभागी झाले होते. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य,व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यामुळे या बाल बाजारात साडेचार लाख रुपये पेक्षा जास्त उलाढाल झाल्याची माहिती मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरळे सर यांनी केले.उपस्थित अनेक पालकांनी या निमित्ताने शाळा व्यवस्थापनाला धन्यवाद दिले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!