क्रांतिवीर शिक्षण संकुल सी बी एस सी च्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती घडवेल:नानासाहेब पटोले

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड 
   ओसाड माळरानावर सौ सुलोचना बाबर व विश्वंभर बाबर यांनी उभे केलेले हे क्रांतीवीर शिक्षण संकुल भविष्यात राष्ट्रीय शैक्षणिक चळवळ उभा करू न आदर्श नवीन भारत घडवून शैक्षणिक क्रांती  घडवेल ग्रामीण भागांतील हि शैक्षणिक संस्था एक आदर्श शैक्षणीक संस्था म्हणून नावारुपास येत असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष आ. नानासाहेब पटोले यांनी म्हसवड येथे व्यक्त केला.
म्हसवड येथे क्रांतिवीर शैक्षणिक संकुलनात सुरु करण्यात आलेल्या सि बी एस सी  शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते, यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सातारा जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, धवलसिंह मोहिते पाटील, डॉ. नरेश देसाई, आर.डी. गायकवाड, महिला काँग्रेस च्या रजनी पवार, रणजितसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, कॉंग्रेसचे माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, क्रांतिवीर शैक्षणिक संकुलनाचे प्रमुख प्रा. विश्वंभर बाबर, मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, इंद्रजित बाबर, नकुसा जाधव, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, नितीन दोशी, विकास गोंजारी, संजय तडाखे, दत्तात्रय भागवत, विष्णुपंत अवघडे, आप्पासाहेब पुकळे आदी प्रमुख उपस्थित होते.
    यावेळी बोलताना नानासाहेब पटोले पुढे म्हणाले पृथ्वीराज बाबा हे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेसच  छोटे छोटे बंधारे बांधण्यात आले आणी या हजारो बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी काम झाले.    सत्तेचा उपयोग जनतेसाठी केला पाहिजे  माणुस ही जात तर माणुसकी हा खरा धर्म आहे याचा विसर सध्याच्या सरकार ला पडला आहे सध्याचे सरकार हे असंवेदनशिल सरकार आहे त्यांना महात्म्यांचे अवमान सहन होतात जे अवमान करतात त्यांना पाठीशी घालण्याचे काम हे सरकार करत आहे हे राज्याला अशोभनिय आहे. शाहु, फुले, आंबेडकर यांचे विचाराला हे सरकार मुठमाती देत आहे.  म्हणून योग्य नेतृत्वाची आवश्यकता असते योग्य नेतृत्वाने विकास होतो  पुढीच सरकार  हे  आपलेच सरकार येणार आहे  आणी बाबर सर मी तुम्हाला शब्द देतो की  तुम्ही ज्या ध्येयाने हे शैक्षणिक संकुल उभे केले आहे ते तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मीआणी बाबा घेत आहे     भविष्य काळात या शिक्षण संकुलात आदर्श विद्यार्थी निर्माण होतील व देशाचे नांव उज्वल करतील   अधिकारी व राजनैतिक क्षेत्रात आपले नावलौकिक वाढवतील व या शिक्षण संकुल चा नावलौकिक देशात होईल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला
यावेळी   बोलताना   पृथ्वीराज  बाबा म्हणाले, आम्ही सत्तेत असताना माण खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारण कामे केली यामुळे या तालुक्यात साखर कारखाने उभे राहिले आहेत, या तालुक्यात पाणी, व औद्योगिक विकास झाला तर या भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. आपल्या देशातील लोकांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. येथील लोकांनी आपल्या मुलांना शिक्षण देणं गरजेचं आहे. हे शैक्षणिक संकुल शिक्षण क्षेत्रात दिप स्तंभ ठरेल. गुणवत्तेत तडजोड न करता येथील शिक्षकांनी शिक्षण देऊन सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे . असे ते म्हणाले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विश्वंभर बाबर यांनी केले. यावेळी भरारी स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनील देसाई, रणजितसिंह देशमुख, विठ्ठल काटकर समृध्दी जाधव यांनीआपले विचार  व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. सुलोचना बाबर आणि इंद्रजित बाबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन विठ्ठल काटकर यांनी केले. राहुल फुटाणे यांनी आभार मानले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!