जयकुमार गोरे यांनी खोट्या गुन्ह्यांचा वापर करून कार्यकर्त्यांवर अन्याय केला” – प्रभाकर घार्गे

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)

म्हसवड :(प्रतिनिधी)

शिरताव (ता. माण) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या गावभेट दौऱ्यादरम्यान भरगच्च बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी घार्गे यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर टीका केली. त्यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून गोरे यांनी प्रशासनाचा दुरुपयोग करून अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.

रोजगार निर्मितीचा प्रश्न अजूनही कायम
घार्गे म्हणाले, “जयकुमार गोरे यांनी या तालुक्यात कुठलाही रोजगार निर्मितीचा साधन तयार केले नाही. गेल्या पंधरा वर्षांत त्यांनी एकाही तरुणाचा संसार उभा केलेला नाही. मी पडळ येथे साखर कारखाना उभा करून युवकांना रोजगार दिला आणि औद्योगिक प्रगती घडवून आणली. मात्र, आजही तालुक्यातील तरुणांना रोजगारासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे एकदाच विश्वास ठेवा आणि मला आमदार बनवा; भविष्यात कोणत्याही गरजेसाठी मागणी करावी लागणार नाही.”

विकासासाठी घार्गे यांना पाठिंबा द्या – अनिल देसाई
महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांनी या बैठकीत जनतेला आवाहन केले की, “प्रभाकर घार्गे हे या तालुक्यातील विकासाचे मॉडेल उभे करू शकतात. त्यांच्या आमदारकीमुळे केवळ गावच नाही, तर तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल.”

घार्गे यांना मताधिक्य मिळवून देऊ” – अभयसिंह जगताप
बैठकीत बोलताना अभयसिंह जगताप म्हणाले, “प्रभाकर घार्गे आमदार झाल्यास कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळेल. त्यामुळे २० तारखेला मतदान करून विजय साकार करणे ही आपली जबाबदारी आहे.”

लोकप्रतिनिधींनी जास्त संधी दिल्या नाहीत
शिरतावमधील उपस्थित मान्यवरांनी सुद्धा मत मांडताना जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. धोंडीराम पिंगळे, किरण खळवे, पांडुरंग लुबाळ, चंद्रकांत शेंडे पाटील, भीमराव निकाळजे यांसारख्या नेत्यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला.

२३ तारखेला विजयाचा गुलाल उधळण्याचा निर्धार
तालुक्यातील जनतेने घार्गे यांना समर्थन देत २३ तारखेला विजयाचा गुलाल उधळण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत तानाजी अहिवळे, नवनाथ शिंगाडे, ज्ञानेश्वर लुबाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिरतावमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराला जोर
प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने गावागावांमध्ये प्रचाराचा जोर वाढवला असून जनतेच्या मागण्या आणि समस्यांना प्रतिसाद देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!