जगात अशांतता असताना आपण भारत देशात जन्माला आलो हे आपले भाग्य – ह.भ.प.शिरीष महाराज म्हसळयात हिंदु धर्म जागरण मेळाव्याला लोटला अथांग जन सागर

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसळा – रायगड

आजच्या घडिला जगात अशांतता निर्माण झाली आहे.ज्या देशांत लोक भाकरीच्या पिठाला मुकले आहेत,ज्या देशांमधुन पंतप्रधानांना देश सोडुन पळून जावे लागते.ज्या देशात अशांतता आहे अशा देशात जन्माला येण्या पेक्षा सनातन आणि सर्वधर्म समभाव आसलेल्या संत महतांच्या भारत देशात जन्माला आलो हे आपले भाग्य असल्याचे संत तुकाराम यांचे ११ वे वंश असलेले हभप शिरिष मोरे महाराज यांनी म्हसळा तालुका शहरात आयोजीत भव्य हिंदु धर्म जागरण मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगीतले.

     त्यांनी धर्म जागृती बाबत अनेक ठोड विषयांना हात घालताना तुम्ही कोणत्याही जातीचे असलात तरी आधी आपण हिंदु आहोत धर्माभिमान जोपासला पाहिजे.बटोंगे तो कटोंगे हा नारा राजकारणा पुरता मर्यादित सीमित नाही तर तो सातत्याने अंमलात आणला पाहिजे.जातींच्या भिंती बाजूला ठेवून हिंदु धर्मासाठी एक व्हायला पाहिजे.धर्मांतर,लव जिहाद,फूड जिहाद,ल्यांड जिहाद पासुन सावध रहा असा इशारा देण्यात आला.

मेळाव्यात म्हसळा तालुक्यातुन हजारोंच्या संख्येने हिंदु जन सागर लोटला होता.संपूर्ण जिल्हाचे लक्ष या मेळावा कडे लागुन राहिले होते,म्हसळा नगरी अगदी भगवामय झाली होती.ग्राम दैवत श्री धाविर देव महाराज प्रांगणातून भव्य धर्म दिंडी जय श्री रामाचे जयघोषात व पांडुरंगाच्या गजरात काढण्यात आली.दिंडी सोबत ह.भ.प.श्री.शिरीष महाराज यांची रथामध्ये बसवून मिरवणुक काढण्यात आली.सोहळ्यात तरुण,ग्रामस्थ, महिला,लहान मुल,अबाल वृद्ध सहभागी होऊन हरिनामाचा गजर करीत दिंडी पुढे सरकत होती. मेळाव्याचे आयोजन न्यु इंग्लिश स्कुल पटांगणात करण्यात आले होते.सुरवातीला हिंदु संघटनेच्या वतीने ह.भ.प.श्री.शिरिष महाराज यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.संघटना अध्यक्ष समीर बनकर यांनी म्हसळयात हिंदु संघटनेची स्थापना कशी झाली आणि हिंदु जन जागृती का होणे गरजेचे आहे आणि ती का करावी लागली याची सविस्तर माहिती विषद केली.मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प.श्री.शिरीष मोरे महाराज यांनी सर्व प्रथम आपण हिंदु म्हणून एकत्र आलात त्या बद्दल सर्वांना धन्यवाद दिले.तुम्ही कोणात्याही जाती धर्माचे असा पण त्याही पेक्षा हिंदू धर्माचा अभिमान बाळगा, आपणा धर्म श्रेष्ठ माना. प्रत्येक राज्यकर्त्याला हिंदुत्वाचा अभिमान वाटला पाहिजे,माझ्या महाराष्ट्रातील बांधवांना सांगणे आहे कि म्हसळा नगरीत येऊन पहा कसा हिंदू एकत्र आहे तो ! हिंदुच्या भूमित म्हसळा नगरीत उर्दु भाषिक फलक लागल्यावरून महाराज यांनी खंत व्यक्त करीत प्रशासनाला पत्र द्या कि इथे फक्त मराठीतच फलक लागले पाहिजेत.आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपली माय बोली भाषा मराठी आहे असे ठणकावून सांगितले.मराठीचा अभिमान बाळगा आपला जन्म या भारत मातेच्या भुमित झाला आहे याचा अभिमान बाळगा असे देखील महाराज यांनी सांगितले.हिंदुना धर्मांतरण करण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे.माझ्या माय बहिणींनो सावध रहा कोणत्याही भुल थापांना बळी पडु नका.आपल्या देशात फूड जिहाद,लव जिहाद,लॅण्ड जिहाद या सारखे प्रकार घडत आहेत या पासुन सावध रहा.आपली मुलगी कुठे जाते,काय करते,कुणा सोबत फिरते या कडे लक्ष द्या या विषयाला हात घालुन समस्थ जन समुदायाला सावधगिरीचा इशारा देण्यात आला.आपल्याच देशात तेही महाराष्ट्रात भगवा वेषधारी साधूना चोर समजून ठेचुन मारले गेले त्या घटनेचा निषेध व्यक्त करताना ती घटना धर्मांतरे घडविणाऱ्या कडून घडल्याचे निदर्शनात आणून देत नेहमी सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिव व्याख्याते सचिन करडे,सुशिल यादव यांनी केले तर आभार सचिव महेश पवार यांनी मानले. कार्यक्रमाची समाप्ती पसायदानाने करण्यात आली. श्रीवर्धन पोलीस उपअधिक्षक सविता गर्जे यांच्या मागदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांचे निगराणी खाली पोलीस प्रशासन यांनी ऊतम सहकार्य केले.प्रसाद व्यवस्था वाटप धन्य निरंकारी सत्संग अनुयायी यांनी चोख पार पाडली.कार्यक्रम सुरळीत व शिस्तबद्ध होण्यासाठी स्वयंसेवक नेमण्यात आले होते.श्रीवर्धन बजरंग दल,म्हसळा तालुका गोरक्षक,म्हसळा बौद्ध महासभा,पत्रकार संघ यांच्या कडुन महाराज यांना पुष्प गुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी म्हसळा हिंदु संघटना अध्यक्ष समीर बनकर यांच्या सह तालुक्यातील प्रत्येक समाज अध्यक्ष यांच्या सह हजारोच्या संख्येने हिंदू बंधव उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!