सद्याच्या युगात गुणवत्ता देणाऱ्या शाळाचं पुढे जातील! डॉ. संदिप पोळ यांचे प्रतिपादन!
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला )
विठ्ठल काटकर
कुकुडवाड/वार्ताहर
सद्या शैक्षणिक क्षेत्रात खुप मोठी स्पर्धा वाढलेली आहे, आपल्या पाल्यच्या शिक्षणासाठी पालक जागृत झाला असून यापुढे गुणवत्ता देतील त्याचं शाळा स्पर्धेत टिकतील असे परखड मत कै. आबासाहेब पोळ शिक्षण संस्थेचे विश्वस्त, संचालक डॉ. संदिप पोळ यांनी व्यक्त केले.
माण तालुक्यातील कै. आबासाहेब शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या सहविचार सभेत ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या सर्व शाखाचे मुख्याध्यापक व सर्व सेवक हजर होते. पुढे बोलताना डॉ. पोळ म्हणाले की सद्या स्पर्धेचे युग आहे. त्यामध्ये शिक्षण क्षेत्रात खुप मोठी स्पर्धा आहे. आज अनेक शाळा व त्यामधील शिक्षक विदयार्थी गोळा करण्यासाठी पालकांच्या दारात फिरत आहेत तर काहीच शाळा प्रवेश फुलं झालेत म्हणून प्रवेश नाकारता आहेत ही आपल्या समोरचे चित्र आहे.
आज ग्रामीण ग्रामीण भागातील पालक शिक्षणाच्या बाबतीत सुजाण झाला आहे, लोकांच्या कडे नाही म्हटलं तरी काही प्रमाणात आर्थिक सुबत्ता आली आहे त्यामुळे खर्चाचा विचार न करता आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
अलीकडे अनेक जिल्हा परिषद शाळा चांगल काम करीत आहेत, तर माधमिक शाळा सुद्धा त्या स्पर्धेत उतरल्या आहेत. अनेक बाह्य परीक्षा, स्पर्धा परीक्षाना विद्यार्थ्यांना प्रविष्ठ करून ग्रामीण भागात असणाऱ्या गोर गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कै. आबासाहेब पोळ शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक भालवडी माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य गजानन पुकळे यांनी केले
मुख्याध्यापक आनंदराव कुंभार, उपशिक्षकांपैकी रस्तुम वाघमारे, सुनिता कारंडे, शिल्पा खासबागे,यांनी नविन शैक्षणिक वर्ष्यासाठी विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल काटकर यांनी केले. तर बळवंत घनवट यांनी आभार मानले.