व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड प्रतिनिधी –
माण विधानसभा मतदार संघ हा खुला होण्यापुर्वी राष्ट्रीय कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला असुन मतदार संघ खुला झाल्यानंतरही कॉग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातुन या मतदार संघात कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाली आहेत, या मतदार संघातील जनतेने आजवर नेहमीच कॉंग्रेसची विचारधारा जोपासली असुन याच पक्षावर येथील सर्वसामान्य जनतेचे प्रेम आहे त्यामुळे आगामी होणार्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने माण – खटाव मतदार हा राष्ट्रीय कॉंग्रेस साठी सोडावा अशी एकत्रित मागणी माण – खटावच्या कॉंग्रेस च्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत करीत माण – खटाव मतदार संघावर दावा सांगितला आहे. राष्ट्रीय कॉंग्रेस चे माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय कॉंग्रेस च्या पदाधिकार्यांनी बैठक संपन्न झाली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस च्या सर्वच पदाधिकार्यांनी माण विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रीय कॉंग्रेस ला सोडावा असा एकत्रित सुर आळवला, यावेळी जेष्ट कॉंग्रेस कार्यकर्ते शिवाजीराव यादव, देवानंद जगताप, संदीप सजगणे, अमरजीत कांबळे, गब्बार काझी , वसंत अवघडे, सदाशिव पाटील, निलेश पोळ, बाबासाहेब बनसोडे, सुनील शेळके, तुषार ओंबासे, रवी शिंदे, साहिल तांबोळी, धर्मराज जगदाळे, अनिल लोखंडे, श्रीदास डमकले, सदानंद राजमाने, अरुण सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने म्हणाले की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश प्राप्त झाले असुन यामध्येही राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सर्वाधिक खासदार निवडुन आले आहेत, यावरुनच राज्यातील सर्वसामान्य जनता ही राष्ट्रीय कॉंग्रेस च्या पाठीशी असल्याचे स्पष्ट होत आहे. तर यापुर्वी राज्यात कॉंग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातुन राज्याचा विकास दर अधिक उंचावला होता, तर त्यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी माण तालुक्याला झुकते माप दिल्यानेच माण – खटावमध्ये विकासाचे नवे पर्व सुरु झाले, आज ही कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातुन जी विकासकामे झाली आहेत त्याच कामाचे श्रेय विद्यमान लोक प्रतिनिधि घेत आहेत. माणची जनता ही खुप सुज्ञ आहे त्यांना माण – खटावला कोणी निधी दिला हे चांगलेच माहित असल्याने येथील जनता आगामी विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेस च्या सोबत राहिल यात शंका नसल्यानेच आम्ही ही जागा आमचे नेते रणजीतसिंह देशमुख यांच्यासाठी पक्षश्रेंष्ठीकडे मागणार असल्याचे माने यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ कॉंग्रेस नेते शिवाजीराव यादव म्हणाले की सर्वसामान्य युवकांच्या हाताला काम देणारे माण – खटावमध्ये एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे रणजीतसिंह देशमुख, त्यांनी माण – खटावचा दुष्काळ हटवण्यासाठी व येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी माण व खटाव या दोन्ही तालुक्यात औद्योगिक प्रकल्प सुरु केले आहेत त्यामुळे आज हजारो युवकांच्या हाताला काम मिळाले असुन त्यांना हे प्रकल्प उभारण्यासाठी राष्ट्रीय कॉंग्रेस नेच मोठा हात दिला आहे, आमचा पक्ष हा सामान्यांला नेहमीच हात देत आला आहे तर आमचे नेतेही नेहमीच सर्वांना मदतीचा हात देत आले आहेत त्यामुळेच माण विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा हाताचा पंजा निवडणुकीचे चिन्ह असले पाहिजे अशीच सर्वसामान्य जनतेची व पदाधिकार्यांची इच्छा असल्यानेच आम्ही हा मतदारसंघ कॉंग्रेस ला सोडण्याची मागणी करणार आहे. यावेळी विविध कॉंग्रेस पदाधिकार्यांनी बोलताना यंदा माण विधानसभा मतदार संघात फक्त रणजितसिंह देशमुख यांचाच बोलबाला असल्यानेच आम्ही लवकरच पक्षश्रेष्ठींना भेटुन त्यांच्यासाठी उमेदवारी मागणार असल्याचे सांगितले.