आपल्या कुटुंबाचा विचार न करता सर्व भारतमाताचं आपलं कुटुंब समजून सीमेवर डोळ्यात तेल घालून नैसर्गिक संकटाचा सामना करत सैनिक शत्रूंचा सामना करत आहेत.म्हणून आपण रात्री सुखाची झोप घेत आहोत.त्यामुळे सैनिकांचे आपण सतत स्मरण केले पाहिजे.त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एकावडे परिवाराने व माथनेवाडी ग्रामस्थांनी आज हवालदार शंकर बाबूराव एकावडे यांची सेवानिवृत्ती निमित्त गावातून काढलेली मिरवणूक व त्यांचा केलेला सन्मान नक्कीच आदर्शवत ठरेल असे मत आजी-माजी सैनिक संघटनेचे पाटण तालुका अध्यक्ष प्रकाश मसुगडे यांनी व्यक्त केले. माथनेवाडी ता.पाटण येथील सैनिक शंकर बाबूराव एकावडे हे २६ वर्षे भारतमातेच्या सेवेतून हवालदार पदावरून निवृत्त झालेबदल एकावडे परीवार व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष आनंदराव देसाई, दत्तात्रय सूतार,दादासाहेब जगदाळे,विनोद साळुंखे, रामचंद्र जगदाळे, महेश सूतार,सलीम काझी, अशोक साळुंखे, सोमनाथ पोतदार गुरुजी,सतीश यादव गुरुजी, सुरेश माने,सरपंच नंदाताई माथने, उपसरपंच गंगाराम माथने, पोलीस पाटील संजय माथने, बापूराव शिवदास, शिवाजी मोरे, सर्जेराव साळुंखे व आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसेच आजी-माजी सैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आनंदराव देसाई म्हणाले, आनंदीबाई व बाबूराव एकावडे या दांपत्याने आपली चारही मुले भारतमातेच्या सेवेत देऊन देशासाठी फार मोठे योगदान दिले आहे.आज त्यांचे नातू ही देशसेवेत आहेत त्यामुळे या कुटुंबाचा फक्त गावालाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला अभिमान आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबुराव एकावडे,सुबेदार रत्नाकांत एकावडे, प्रकाश एकावडे,नायक वैभव एकावडे अमोल एकावडे, राहूल एकावडे, आर्यन एकावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.स्वागत आनंदराव माथने यांनी केले तर आभार चंद्रकांत माने यांनी मानले.