चाफळ विभागातील दाढोली भागात असलेल्या खोनोली ता. पाटण येथे शेतात लावलेल्या गवताच्या गंजीला अचानक लागलेल्या आगीत गंजी जळून खाक झाल्याची घटना मकर संक्राती दिवशी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
या आगीत दोन शेतकऱ्यांचे सुमारे २०हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. खोनोली येथील शंकर परशुराम जाधव व पोपट विष्णू जाधव या शेतकऱ्यांनी गावात असलेल्या शेतामध्ये गवताच्या गंजी लावलेल्या होत्या. दुपारी एक वाजता अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण गंजी जळून खाक झाल्या. या आगीत दोन हजार गवताच्या पेंढया,भुईमुगाचे वेल जळून खाक झाले. याआगीतदोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. तरी शासनाने या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.