म्हसवड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागामार्फत होणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एच.एस.सी.) परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होत आहे. म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज हे केंद्र क्रमांक 1404 म्हणून निश्चित करण्यात आले असून, एकूण 480 विद्यार्थी येथे परीक्षा देणार आहेत.
बैठक व्यवस्थेचे नियोजन
या केंद्रावर दोन ठिकाणी परीक्षा होणार असून मुख्य केंद्र सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, म्हसवड आणि उपकेंद्र ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, म्हसवड असेल.
सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, म्हसवड: 12 खोल्यांमध्ये 300 विद्यार्थी (बैठक क्रमांकFo35098 ते Fo35397)
ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, म्हसवड: 5 खोल्यांमध्ये 125 विद्यार्थी (बैठक क्रमांकFo35398 ते Fo35522)
उर्वरित 29 विद्यार्थी (बैठक क्रमांकFo35523 ते Fo35578) सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, म्हसवड येथे परीक्षा देतील.
कडक कॉपीमुक्त अभियान
परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र संचालक श्री. दिलीप माने यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये मोबाईल, डिजिटल घड्याळ, कॅल्क्युलेटर तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन आणण्यास सक्त मनाई असल्याचे स्पष्ट केले आहे.
नियोजन आणि दक्षता पथक
केंद्र संचालक: श्री. दिलीप माने
उपकेंद्र संचालक: श्री. संतोष देशमुख व श्री. कलढोणे
सहायक म्हणून : श्री. प्रवीण भोते व श्री. गोषण वळवी
दक्षता कमिटी आणि स्थानिक नागरीक यांची विशेष नियुक्ती
तालुका, जिल्हा आणि केंद्र प्रमुखांच्या भरारी पथकांमार्फत अचानक भेटी घेऊन परीक्षा केंद्रांची पाहणी केली जाणार आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून कडक सुरक्षा आणि देखरेख यंत्रणा कार्यरत राहील.
विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना
सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री. दासरे यांनी विद्यार्थ्यांना भीतीमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असे आवाहन केले आहे. परीक्षेच्या वेळेस कोणतेही अपप्रकार टाळावेत आणि शांततेत परीक्षा द्यावी असे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष उपाययोजना
केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी दक्षता पथक कार्यरत असेल.
कॉपीमुक्त वातावरण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन.
ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असून, योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा पार पडेल, असा विश्वास परीक्षा संचालकांनी व्यक्त केला आहे.