गोंदवले: याची देही याची डोळा श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न!
म्हसवड : श्री. क्षेत्र गोंदवले येथे काल पहाटे श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या वेळी पहाटे ५.५५ मिनीटांनी लाखांवर भाविकांच्या ‘उपस्थितीत पुष्पवृष्टी करण्यात आली. रघुपती राघव राजाराम पतीत पावन सिताराम” च्या जयघोशाने परिसर दुमदुमून गेला. गोंदवले येथील सर्व रस्ते ही भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. देवस्थान ट्रस्ट ने तसेच मंदिर परिसरात व बाहेरील बाजूस रस्त्यावर एलइडी ची सेवा सर्वत्र केल्याने तसेच ऑनलाईन लाईव्ह सोहळा उपलब्ध करून दिल्याने भाविकांनी याची देही याची डोळा श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा अनुभवला.
गेले दोन दिवस महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटकाच्या कानाकोपयातून भाविक गोंदवले येथे पुण्यतिथी महोत्सवाच्या सोहळ्यासाठी येत होते. रात्रभर भाविक गोंदवले नगरीत येतच होते. पहाटे पाचच्या सुमारास गोंदवल्याच्या चारही बाजूंनी रस्त्यावर गाड्याच दिसत होत्या. श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या मंदीरातील व सभास्थानावरील कार्यक्रम भाविकांना दिसावेत म्हणून ठिकठिकाणी मोठे एल. सी.डी. स्क्रीन लावण्यात आले होते. मंदिर परिसराबरोबरच रस्त्यांवर ही एल. सी.डी. स्क्रीनवर मंदिरातील कार्यक्रम भाविकांना लाईव्ह पाहता आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
पहाटे २-५५ वा. पहिली घंटा झाल्यावर सनई व त्यानंतर भूपाळ्या व काकड आरती ब्रहमानंद मंडपात झाली. त्यानंतर भोजन कक्षामध्ये श्री महाराजांचा मोठा फोटो ठेवून सजवण्यात आलेला होता.धून सनई ऐकवण्यात आली. त्यांनंतर वेदघोष करण्यात आला. ५.२४ पर्यंत “रघुपती राघव राजाराम चा जयघोष करण्यात आला. त्यानंतर जालना येथील हबप रामदास बुवा आचार्य यांचे प्रवचन झाले.
पहाटे ५.५२ वाजले पासून चिंतन करण्यात आले. त्याचवेळी समाधी मंदिरातून “श्रीराम श्रीराम “असा नामघोष करण्यात आला, बरोबर ५.५५ मिनीटांनी श्रीं” चा जयजयकार करत श्रींच्या समाधीवर गुलाल व पुष्प अर्पण करण्यात आले. त्याचवेळी भाविकांनी श्री महाराजांच्या प्रतिमेवर व सीडी स्क्रीन वरील श्री. महाराजांच्या प्रतिमेला गुलाल फुले वाहिली, रामनामाचा गजर झाल्यानंतर ”श्रीं’ची आरती झाली. आरतीनंतर सभामंडपातील कार् पुण्यस्मरण कार्यक्रमाची सांगता झाली.त्यानंतर हजारो भाविकांनी रांगेने दर्शन घेतले.त्यानंतर
सकाळी ७ ते ८ ब्रहमानंद मंडपामध्ये भजन झाले.
रामनामाच्या भक्तिच्या मळ्यात भजन, किर्तन,प्रवचन आदि कार्यक्रमांनी हजारो भाविक भक्तिरसात अखंड न्हाहून निघाले.
अत्यंत शांततेत सर्व कार्यक्रम पार पडले.