समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे ध्येय: महाराष्ट्रात नासप च्या सहकार्याने विचाराने काम करणार… राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
अमरावती:
आभा नामदेव क्षत्रिय महासंघाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे यांनी समाजाच्या विकासासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे. पारंपरिक टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

भास्करराव टोम्पे यांची सर्वसंमतीने राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड नुकत्याच झालेल्या उजंबवाडीत महासंघाच्या बैठकीत करण्यात आली. महासंघाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून 18 राज्यांमध्ये तो कार्यरत आहे. 2027 पर्यंत त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या वेळी नामदेव समाजोन्नती परिषदचे सरचिटणीस डॉक्टर अजय फुटाणे, सातारा जिल्हाध्यक्ष इंजि सुनील पोरे केशवराज संस्था अध्यक्ष बाळ आंबेकर सहचिटणीस शित्रे, पुणे सरचिटणीस सुभाष मुळे पिंपरी चिंचवड अध्यक्ष एकनाथ सदावर्ते प्रसिद्धी प्रमुख मनोज मांढरे यांचेसह अठरा राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते

टोम्पे यांनी संत नामदेव महाराजांचे योगदान अधोरेखित करत पंढरपूर येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा मानस व्यक्त केला. सरकारने या स्मारकासाठी कोठ्यावधी रुपये मंजूर केले असून लवकरच यासाठी प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजाचा विकास व धोरणात्मक मागण्या:
समाजातील 90 टक्के लोक गरीबीरेषेखाली असून त्यांना टेक्सटाईल पार्कमध्ये 2 टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी टोम्पे यांनी केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शुल्क माफीसारखे उपक्रम राबवून त्यांनी समाजाला प्रोत्साहन दिले आहे.

यावर्षी होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात सुमारे एक लाख प्रतिनिधी सहभागी होतील. समाजातील तरुण आणि महिलांना नेतृत्वाची संधी देऊन त्यांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवले जातील.

टोम्पे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समाजाच्या समस्या मांडण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय स्तरावर समाजाची ओळख निर्माण करण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

टोम्पे म्हणाले, “एकात्मतेत मोठी ताकद आहे. समाज एकत्र येऊनच पुढे जाईल.” त्यांनी सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर देत महिला, विधवा, विधुर आणि घटस्फोटितांसाठी सामूहिक विवाह परिषदा घेतल्या आहेत.

महाराष्ट्रात नासप चे सहकार्याने विचाराने काम करणार असल्याचे सांगून …सातारा जिल्ह्यातील इंजि सुनील पोरे यांनी केलेले कामाची भास्करराव टोम्पे यांनी प्रशसा केली

भाष्करराव टोम्पे यांच्या नेतृत्वाखाली आभा नामदेव क्षत्रिय महासंघाचा विकासाचा प्रवास नवी दिशा घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!