व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसळा – सुशील यादव
तालुक्यातील शेतकऱ्यांनी रानावनात किंवा गावाचे आसपास चरण्यासाठी सोडलेली गाय वर्गीस गुरे घरात परत येतच नसल्याने ती जातात कुठे असा प्रश्न गावा गावात शेतकरी राजाला आ वासुन पडत आहे ? म्हसळा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची दुभती गाय जनावरे आणि नांगरकीचे बैल चोरीला जात असल्याची घटना व तक्रारीत वाढ झाली आहे.
गो धन चोरीला गेल्याचे अनेक घटनांचा उलगडा होऊन पोलिसांनी आरोपींनी बेड्या ठोकल्या असल्या तरी गोधन चोरीच्या घटना अधुन मधुन घडतच आहेत.अशीच गोधन चोरीची घटना म्हसळा शहराला लागुनच असलेल्या खारगाव खुर्द येथील शेतकरी चंद्रकांत पांडुरंग कांबळे यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची ९ वर्षाची दुभती गाय आणि दोन वर्षाची कालवड दिनांक १४/०४/२०२४ पासुन चोरीला गेली आहे.
रोजच्या रोज गावा शेजारील रानमाळावर गाय आणि तिची कालवड चरण्यास गेली त्या घरी आल्या नाहीत. अनेक दिवस शोध घेवून सापडत नसल्याने त्या नक्कीच चोरील्या असल्याने शेतकरी चंद्रकांत कांबळे यांनी म्हसळा पोलिस ठाण्यात गोधन चोरी झाल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे.तक्रार अर्जात त्यांनी अज्ञात इसमाचा शोध घेवून करवाई करण्याची मागणी केली आहे.तक्रार अर्जात त्यांनी या आगोदर दोन गाई आणि बैल चोरीला गेले असल्याचे नमुद केले आहे. म्हसळा तालुक्यात अधुन मधुन शेतकऱ्यांचे पाळीव गोधन चोरीला जाण्याच्या घटना घडतच आहेत.गुरे चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलीसांनी गुरे चोरी करणाऱ्यांवर पाळत ठेवून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे