पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध; म्हसवड मुस्लिम समाजाकडून राष्ट्रपतींना निवेदन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, :प्रतिनिधी
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी म्हसवड शहर मुस्लिम समाजाने राष्ट्रपतींच्या नावे निवेदन दिले. हे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याहस्ते देण्यात आले.

22 एप्रिल रोजी झालेल्या या भीषण हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, यात बहुतांश पर्यटकांचा समावेश होता. म्हसवड मुस्लिम समाजाने दिलेल्या निवेदनात या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. “हा भ्याड हल्ला भारताच्या शांतता आणि एकतेवर घातलेला घाला आहे,” असे निवेदनात म्हटले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत, म्हसवड मुस्लिम समाजाने जखमींच्या लवकर प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे नमूद करत, पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. “भारताच्या संयमाची सातत्याने परीक्षा घेतली जात असून, सरकारने यावर निर्णायक पावले उचलली पाहिजेत,” अशी भूमिका समाजाने मांडली आहे.

याआधी उरी (2016) आणि पुलवामा (2019) हल्ल्यांनंतर भारताने ठोस प्रत्युत्तर दिल्याची आठवण करून देत, मुस्लिम समाजाने सरकारकडून तातडीने कठोर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर दबाव वाढवणे आणि गरज पडल्यास लष्करी कारवाई करणे, यासारख्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

“राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आपण पावले उचलावीत,” अशी विनंती राष्ट्रपतींना करण्यात आली आहे. म्हसवड मुस्लिम समाजाने राष्ट्रीय एकतेसाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाहीही दिली आहे.
यावेळी मोठ्या संख्येने म्हसवड शहरातील मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!