आ. जयकुमार गोरेंच्या कामांच्या झपाट्यामुळे वडूज आणि खटाव तालुक्याचा कायापालट : खा . निंबाळकर -४६ कोटींच्या नळपाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड

            आ. जयकुमार गोरेंच्या कामांच्या झपाट्यामुळे वडूज आणि खटाव तालुक्याचा कायापालट होत आहे. ४६ कोटी ६७ लाखरुपयाच्या निधीतून कार्यान्वित होणारी ही योजना संपूर्ण वडूज शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटणार आहे  जल जीवन मिशन  अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळाचे पाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे     आमच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारच्या माध्यमातून या भागातील दुष्काळी पाणीयोजना, ग्रीन कॉरिडॉर, एमआयडिसी, रस्त्यांची कामे आम्ही मार्गी लावली आहेत. यापुढेही केंद्रातून लागेल तेवढा निधी आम्ही आणणार आहोत. जिहेकठापूर योजनेच्या पाणीपूजनासाठी पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मंत्रीमंडळ लवकरच माण मतदारसंघात येणार असल्याचे प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.  वडूज येथे केंद्राच्या अमृत – २ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ४६ कोटी ६७ लाखांच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. 
                   यावेळी आ. जयकुमार गोरे , मा.आ.दिलीपराव येळगावकर, सरचिटणीस जयकुमार शिंदे, तहसीलदार बाई माने, मुख्याधिकारी कपिल जगताप, तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, नगराध्यक्षा मनीषा काळे, हेमंत पेठे, प्रदीप शेटे, काका बनसोडे, किसनराव गोडसे, नंदूभैय्या गोडसे, सोमनाथ भोसले, भरत जाधव, निलेश करपे, रेश्मा बनसोडे, स्वप्नाली गोडसे, राधिका गोडसे, आरती काळे, जयवंत पाटील, सोमनाथ जाधव, सचिन माळी, शशिकांत पाटोळे, अभय देशमुख, अनिल गोडसे, संभाजी गोडसे, विनोद गोडसे,  नगरपंचायतीचे नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते.
   
          यावेळी बोलताना आ. गोरे  म्हणाले, माझ्या विरोधकांनी कधीच पाण्यासाठी आणि विकासकामांसाठी माझ्या विरोधात लढाई केली नाही. त्यांनी कधी रस्ते, पाणी योजना, एमआयडिसीसाठी संघर्ष केला नाही. जातीपातीचे राजकारण करुन जयकुमारचा पराभव करणे हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. गेल्या निवडणूकीत २८ जण एकत्र आले मात्र त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली. आता तर त्यांच्या नेत्याकडे आठजणही राहिले नाहीत. वडूजमध्ये त्यांना सत्ता मिळाली मात्र सहा महिन्यातच निष्क्रिय रागरंग ओळखून नगराध्यक्षा विकासकामांसाठी भाजपाच्या विचारधारेशी एकरुप झाल्या. आणखी बहुतांश नगरसेवक आमच्या बाजूला आले. ज्यांना स्वतःचे पदाधिकारी सांभाळता येत नाहीत त्यांना तालुका आणि मतदारसंघ संभाळता येणार नाही हे जनतेने जाणले आहे असा टोला त्यांनी प्रभाकर देशमुखांना लगावला. त्यांच्या सत्तेच्या कालावधीत त्यांना वडूजमध्ये एक काम आणता आले नाही. रात्री उशीरापर्यंत बैठका घ्यायचा फार्स ते करत होते.  सेवानिवृत्त व्हायच्या आधी त्यांना फक्त घ्यायची सवय होती. द्यायची दानत त्यांच्यात नव्हती. आताही ते  कोणतेच विकासकाम करु शकत नाहीत जे माहित झाल्याने त्यांना त्यांचेच लोक सोडून जात आहेत. मी कुणाच्या नादाला लागत नाही आणि नादाला लागलो तर नाद पुरा केल्याशिवाय गप्प बसत नाही असा इशारा त्यांनी स्थानिक विरोधकांना दिला. 
          वडूजमध्ये जे नगरसेवक आमच्या विचाराने काम करायला तयार झाले आहेत त्यांच्या प्रभागात कोट्यवधींचा विकासनिधी दिला आहे. दीड कोटींची पथदिव्यांची कामे मंजूर केली आहेत. छ. संभाजी महाराज चौक सुशोभिकरणासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करुन आणला आहे. सर्वच प्रभागात तीस कोटींचा निधी खर्चून विकासकामे केली जात आहेत. औंधमध्ये सगळे राज्यसरकार येत होते तेव्हा कुणी १६ गावांच्या पाण्यासाठी चकार शब्द काढला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसाठी पाणी आरक्षित केले आहे. मी विधानसभेत याबाबत भूमिका मांडल्यावर विषय पेटवत ठेवायचा म्हणून विरोधकांनी मोर्चा काढला. उरमोडी, तारळी, टेंभू, जिहेकठापूरचे पाणी आणण्यात मला यश आले आहे. औंधसह १६ गावांचा पाणीप्रश्नही मीच मार्गी लावणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
                    डॉ. येळगावकरांनी बोलताना गेल्या विधानसभा निवडणूकीत ज्यांना जवळ केले ते नालायक निघाल्याचे सांगत प्रभाकर देशमुखांचा समाचार घेतला. १९८० सालापासून पाण्यासाठी संघर्ष करत आलो आहे. अनेक आंदोलने, उपोषणे केली. काही प्रमाणात मला यशही आले. आ. गोरेंनी पाण्यासाठी खऱ्या अर्थाने यशस्वी प्रयत्न केले आहेत. भाजपाच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरु आहेत. आम्ही एकत्र काम करुन तालुक्याचे उर्वरित प्रश्न मार्गी लावणार आहोत असेही त्यांनी सांगितले. 

कर्यक्रमात बोलताना नगराध्यक्षा मनीषा काळे, अनिल गोडसे, रेश्मा बनसोडे, अभय देशमुख, जयवंत पाटील यांनी आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नामुळे वडूजचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी केले. 
नगरपंचायत इमारत, छ. शिवाजी महाराज पुतळा  आणि कचरा डेपोच्या जागेसाठी निधी देणार.….
                वडूज नगरपंचायत इमारतीसाठी १० कोटी, छ. शिवाज महाराज पुतळा आणि छ. संभाजी महाराज चौक सुशोभीकरणासाठी लागेल तितका निधी देणार आहे. कचरा डेपोसाठी जागा खरेदी केली जाणार आहे. विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातही विकासकामांसाठी निधी देत आहे. ग्रीन कॉरिडॉर अंतर्गत विमान उतरण्यासाठी ट्रॅकची सोयही करत असल्याचे आ. गोरे यांनी सांगितले. 

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!