क्रांतिवीर शाळेत बाल बाजार व    तृणधान्य महोत्सव.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

  म्हसवड …प्रतिनिधी
                विद्यार्थ्यांमधील व्यवहारीक व आहारविषयक ज्ञानाची वृद्धी होऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हसवड येथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवाडी शाळेमध्ये नुकताच बाल बाजार व तृणधान्य महोत्सव आयोजित केला होता.
    क्रांतिवीर शाळा म्हसवड येथे आयोजित केलेल्या बाल बाजार व तृणधान्य महोत्सवाचा शुभारंभ थोर साहित्यिक  अजित काटकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर,संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर,मुख्याध्यापक अनिल माने व सुभद्रा पिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी बोलताना लेखक अजित काटकर म्हणाले अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाचे धडे मिळाले पाहिजेत .त्यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे. तृणधान्य हा आहारातील महत्त्वाचा घटक असून त्याबाबतची जनजागृती क्रांतिवीर शाळेने केल्याबद्दल   तसेच शाळेच्या उपक्रमशीलते बद्दल समाधान व्यक्त करून शाळेला स्वलिखित पुस्तकाची भेट दिली.
      क्रांतिवीर शाळेतील विद्यार्थ्यांनी अनोखा  भरगच्च बाल बाजार आयोजित केला होता.यामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला ,फळे,  टी स्टॉल,शालेय साहित्य,किराणा साहित्य,याबरोबरच चटकदार व चमचमीत खाऊच्या पदार्थांच्या स्टॉलची रेलचल होती .बाल बाजार उपक्रमात शाळेतील 500 विद्यार्थी सहभागी झाले होते याद्वारे एकूण 2 लाख 65 हजाराची उलाढाल झाल्याची माहिती मुख्याध्यापिका सुलोचना बाबर व त्यांच्या सहकारी टीमने दिली.
    या निमित्ताने वैशिष्ट्यपूर्णरित्या तयार केलेल्या मानवी आहार विषयक तृणधान्य आराखडा तसेच शेत बांधावर जेवण करणारे  शेतकरी  कुटुंब
प्रतिकृतीला  पालक व विद्यार्थ्याकडून विशेष प्रतिसाद मिळाला.या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दलअनेक पालकांनी शाळा व्यवस्थापनाला धन्यवाद दिले.या कामी क्रांतिवीर शाळेतील सर्व शिक्षकानी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन रोहिणी काटकर व तुकाराम घाडगे यांनी केले .

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!