उमेद महिला मेळाव्यात उत्साहाचा जल्लोष – सेंद्रिय शेती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते,
कराड:प्रतिनिधी

कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात उमेद महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. निळेश्वर मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांच्या सशक्तिकरणासह सेंद्रिय शेती व पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

महिला व बचत गटांच्या सशक्तीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या “उमेद” उपक्रमांतर्गत विविध योजना राबविल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, वडोली निळेश्वर येथील महिलांनी उद्योग, स्वयंरोजगार व बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचा निर्धार केला. या मेळाव्यात महिलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात कृषी तज्ज्ञ विशाल महाजन यांनी सेंद्रिय शेती व परसबाग या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. महिलांनी परसबाग उपक्रम राबवून घरच्या घरी ताजी, विषमुक्त भाजीपाला पिकवावा, यावर त्यांनी भर दिला. गावातील एकरी माता मंदिर परिसरात स्वाती पवार यांनी महिलांना परसबाग व वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे.

या प्रसंगी कृषी सखी भारती पवार यांच्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला पंचायत समिती कृषी विभागाच्या पूनम जाधव, कृषी विज्ञान केंद्र कालावडेचे विशाल महाजन, ग्रामसेवक पुष्पा कोळी, सरपंच भीमराव मदने, उपसरपंच संभाजी पवार, चेअरमन सुनील पवार रवी जगदाळे गणपत कुंभार राणी चव्हाण अर्चना इंगवले गीतांजली जगदाळे संगीता पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुशांत तोडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन भारती पवार यांनी मानले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!