ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव आटण्याच्या मार्गावर, पाणी उपसा तातडीने थांबावावा :वन्य पशु पक्षी प्रेमिंकडून मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विशाल माने
देवा पूर

                सातारा सांगली सोलापूरच्या सीमारेषेवर स्थित असणाऱ्या ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव आटण्याच्या मार्गावर आहे. म्हसवड  मध्यम प्रकल्प म्हणून ओळख असणाऱ्या राजेवाडी तलावात आज रोजी अवघा उपयुक्त पाणी साठा १.२४ द.ल.घ.मी अर्थात २.६८%  द.ल.घ.मी असून देखील राजेवाडी, हिंगणी, पळसावडे येथील शेतीसाठी अंदाजे  ३०० ते ४००विद्युत मोटारीतून पाणी उपसा रात्रंदिवस सुरू असून वन्य प्राणी, मुकी पाळीव जनावरे तसेच मत्स्य बिजांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने विद्युत मोटारीने होत असलेले पाणी उपसा तातडीने थांबावावा यासाठी मा. जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालावे अशी मागणी वन्य पशु पक्षी प्रेमिंकडून होत आहे.

               राजेवाडी तलावची भिंत ही सोलापूर जिल्ह्यात येत असली तरी पाणी साठवण भाग हा सातारा जिल्ह्यात येतो. तलावाच्या नजिक पीलिव घाट डोंगर रांग आहे तर पळसावडे नजीक काळा ओढा या दोन्ही परिसरात  हरीण, कोल्हे, लांडगे, तरस, सायाळ, अशा विविध वन्य प्राणी तसेच पशु पक्षांचे आश्रय स्थान आहे. मागील आठवड्यात गवा जातीच्या नर मादीचे दर्शन या परिसरात झाले असून. वन्य प्राणी रात्री अपरात्री तलावातील पाणी पिण्यासाठी येत असतात. याठिकाणी पंच क्रोशितील मेंढपाळ, जनावरे पाण्यासाठी, चाऱ्यासाठी येत असतात. एक तर मुक्या जनावांसहित नागरिकांना पिण्याचे पाणी नाही, तलावातील मृत साठा आटला तर काय करायचे? हा यक्ष प्रश्न आ वासून उभा आहे.त्याच बरोबर देवापूर मच्छीमार व्यावसायिक सहकारी सोसायटी अंतर्गत १७५  मच्छीमार व्यावसायिकांच्या तलावातील पाणी उपशामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या पुढे मत्स्य बीज टिकवणे आवाहन होऊन बसले आहे.

                 सदरचा तलाव हा १८७६मध्ये ब्रिटिश रानी व्हिक्तोरिया हिने बांधला होता. याची साठवण क्षमता १.६९२टी.एम.सी असून या तलावामुळे ४४हजार २०८एकर क्षेत्राला लाभ होतो. तलाव भरल्यानंतर ४८०चौरस मैल पाणलोट क्षेत्रामध्ये पाणीच पाणी असते. सद्यस्थितीत तलावात १४९३ दक्ष लक्ष घनफूट गाळामुळे पाणीसाठा कमी होऊन सुमारे दहा हजार एकर सिंचन क्षेत्राला फटका बसला आहे.

: माननीय जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी

             राजेवाडी तलावात पुरेसे पाणी नसल्याने देवापुर मच्छीमार सोसायटी अंतर्गत १७५मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून तसेच वन्य जीवांना पाणी उपलब्ध होत नसल्याकारणाने उरमोडीचे पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे. मच्छिमार हा व्यवसाय देवापूर मधील शेकडो कुटुंबाचा आधार असताना तलावातील पाणी उपशामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? हा यक्ष प्रश्न मच्छीमारांसमोर आहे तरी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून पाणी उपसा थांबावावा अशी मागणी जोर धरत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!