रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान ,उत्तम ज्ञानाने एक उत्तम पिढी तयार होते रामकृष्ण दळवी.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते कराड

समाजसेवेसाठी समर्पित योगदान देणारे गोव्याचे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण दळवी यांना “युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र” यांच्या वतीने सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सातारा येथे 31 जानेवारी 2025 रोजी आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

दळवी यांनी जनसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून समाजातील उपेक्षित आणि गरजू लोकांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा पुरस्कार केवळ माझा नाही, तर माझ्यासोबत कार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान आहे.”

ते पुढे म्हणाले, “तरुण वयात देता येण्यासारख्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात – ज्ञान आणि रक्तदान. उत्तम ज्ञानाने सुसंस्कृत पिढी घडते, तर रक्तदानाने गरजूला जीवनदान मिळते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात द्याव्यात.”

रामकृष्ण दळवी हे वीर सावरकर युवा मंच, गोवा यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती आणि हिंदुत्ववादी विचार प्रसारासाठी विविध उपक्रम राबवत असतात.
या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,आमदार मनोज घोरपडे, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराज, संपादिका रुपाली सावंत .असे अनेक मान्यवर यांच्यावतीने प्रतिनिधी म्हणून सातारा जिल्हा पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, साखळी नगराध्यक्ष सिद्धी प्रभू तसेच अनेक मान्यवरांनी दळवी यांना शुभेच्छा दिल्या


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!