उड्डाण पुलाच्या मागणीसाठी उंब्रज ग्रामस्थांच्या वतीने पुणे बेंगलोर हायवेवर रास्ता रोको

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते,
उंब्रज (कराड)प्रतिनिधी

      उंब्रजमधील पारदर्शक पुलाची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित आहे उंब्रजमध्ये उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी आता उंब्रज ग्रामस्थाकडून व आजूबाजूच्या परिसरातील गावातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. यासाठी उंब्रज व परिसरातील गावातील नागरिकांनी एकत्र येऊन उंब्रज येथील पुणे-बेंगलोर हायवेवर रास्ता रोको आंदोलन केले.

        गेल्या दोन-चार वर्षापासून उंब्रजमध्ये उड्डाणपूल करावा अशी मागणी उंब्रज मधील ग्रामस्थ करत आहेत. येथे सतत होणारे अपघात आणि वाहतुकीची कोंडी, नाहक बळी जाणारी जनता याला जबाबदार कोण? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जातोय.

         महामार्ग ठेकेदार हा ग्रामस्थांवर दमदाटी करून काम चालू करत आहे आणि अरेरावीची भाषा करत आहे, तेव्हा उंब्रजमध्ये कराडच्या धर्तीवर सेगमेंटल पुल झाला पाहिजे. अन्यथा आम्ही रस्त्याचे काम करू देणार नाही. यासाठी आम्हाला जे काही करावे लागेल ते आम्ही करणार आहोत. हा विषय एकट्या उंब्रजचा नाही तर आसपास असणाऱ्या 45 गावांचा आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा उंब्रजकरांच्या तीव्र रोशाला सामोरे जावे लागेल. असा इशाराच उंब्रज ग्रामस्थांकडून यावेळी देण्यात आला

         यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकी यावेळी दिसून आली. भाजपचे नेते मनोज दादा घोरपडे यांनी पारदर्शक पुलासाठी आपण दिल्लीपर्यंत जाणार असल्याची माहिती दिली तर सरपंच योगराज जाधव यांनी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराच यावेळी दिला.

         यावेळी उपस्थित सरपंच योगराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य मा. सोमनाथ जाधव, निवास जाधव, विकास जाधव, शंकरराव शेजवळ, महेश बाबा जाधव, मारुती शेठ जाधव तसेच उंब्रज व परिसरातील गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उंब्रज पोलिसांचा चोक बंदोबस्त पहावयास मिळाला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!