अदानी घोटाळ्याची चर्चा होऊ नये म्हणून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा भाजपचा प्रयत्न : रणजितसिंह देशमुख
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड प्रतिनिधी
अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समिती गठीत करून करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली आहे. मात्र मोदी सरकार संसदेचे कामकाज चालू देत नाही. अदानीला वाचविण्यासाठी मोदी सरकार सर्व ताकद पणाला लावत आहे. अदानी घोटाळ्याची चर्चा होऊ नये म्हणून भाजपकडून जाणीवपूर्वक राहुल गांधी यांच्यावर आरोप करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचे राष्ट्रीय काँग्रेस चे नेते रणजितसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय काँग्रेस चे माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांच्या निवासस्थानी आयोजीत पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते, यावेळी खटाव काँग्रेस चे नेते डॉ. महेश गुरव, अल्पसंख्याक विभागाचे गब्बारभाई काझी, शिवाजीराव यादव, निवेश घार्गे आदी प्रमुख उपस्थित होते, पुढे बोलताना देशमुख यांनी सांगितले की
मोदी सरकारमधील मंत्र्यांनी गांधी यांच्यावर खोटे आरोप लावले त्यावर गांधी यांनी संसदेत उत्तर देण्याची तयारी दाखविली. पण त्यांना बोलण्याची परवानगी दिली जात नाही. गांधी यांनी अदानी घोटाळ्याबाबत मोदी सरकारला प्रश्न विचारल्यानंतर ९ दिवसांनंतर गांधी यांच्या विरोधातील मानहानीचे प्रकरण बाहेर काढण्यात आले. गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि २४ तासातच त्यांची खासदारकी रद्द केली. आता त्यांचे सरकारी निवासस्थान खाली करण्याचे नोटीसही पाठविण्यात आली मोदी सरकार राहुल गांधी यांच्यावर सूडबुध्दीने कारवाई करीत आहे.देशात एकप्रकारे हुकुमशाही सुरु असुन त्याचा जो कोणी विरोध करेल त्याला खोट्या केसेसमध्ये अडकवले जात आहे. केंद्र व राज्य सरकारकडुन सुरु असलेल्या या दडपशाही विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडुन संपूर्ण भारत भर हात जोडो अभिमान राबवले जाणार आहे ग्रामीण जनतेला केंद्राची व राज्याची सुरु असलेली दडपशाही, महागाई याविषयी काँग्रेस ची भूमिका समजावुन सांगितली जाणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. महेश गुरव म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत अदानी यांच्या घोटाळ्या संदर्भात काही प्रश्न विचारले. अदानी उद्योग समूहात गुंतवलेल्या शेल कंपन्यातील २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत. यामध्ये एका चिनी नागरिकाचाही समावेश असून तो चीनी नागरीक कोण आहे उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा संबध काय आहे ,विमाणतळ,संरक्षण क्षेत्र,उर्जा क्षेत्रात सरकारने अदानीला कशी मदत केली ऑस्ट्रेलिया श्रीलंका बांगला देश,दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी अदानीला सोबत घेऊन गेले व तेथील कंत्राटे देण्यासाठी दबाव आणला तसे राहुल गांधी यांनी कागदपत्रासह पुरावे दिले आहेत गांधी व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत अदानी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र या दोघांच्या भाषणाचा भाग संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला.
माण कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने यांनी सांगितले की यापुढे हात जोडो अभियान माण तालुक्यात प्रभावीपणे राबवत शेतकऱ्यांच्या बांधाबांधावर जावुन आमची भुमिका मांडणार असुन तालुक्यातील प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवुन सामान्य जनतेच्या न्यायहक्कासाठी व प्रश्नासाठी त्यांच्या सोबत राहणार आहे.