भाजपच्या जुलमी राजवटीला  हद्दपार करण्यासाठी सज्ज रहा – श्रीरंग चव्हाण |

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड 
म्हसवड 
जाती- जातीत तेढ निर्माण करुन आपली पोळी भाजून घेणाऱ्या  भाजपाच्या जुलमी राजवटीला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे असे आवाहन सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी ज्येष्ठ नेते श्रीरंग चव्हाण यांनी राणंद  ता. माण येथे केले. माण तालुक्यातील . आंधळी, मार्डी, कुकुडवाड, गोंदवले, बिदाल या पाच जिल्हापरिषदेच्या गटात सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मतदार संपर्क अभियान व जनजागृती निमित्त  दौऱ्याचे आयोजन केले असून.  राणंद ता माण येथे संपन्न झालेल्या आढावा बैठकीत  जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य व हरणाई सूतगिरणीचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, , माण खटाव विधानसभा अध्यक्ष डॉ. महेश गुरव,सातारा जिल्हा समन्वयक सर्जेराव पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अमर कांबळे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष गब्बार काझी,शिवाजीराव यादव, संदिप चव्हाण,भिमराव काळेल,    इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना  प्रभारी श्रीरंग चव्हाण म्हणाले जाती- जातीत- तेढ निर्माण करून महागाई व बेरोजगारी या मुद्द्यावर दुर्लक्ष करून भाजप सरकार निवडणूक आधी  दंगली व तेढ निर्माण करून मुळ – प्रश्न बाजूला ठेवून जनतेची दिशाभुल करण्याचे काम हे सरकार- करीत आहे गेल्या नऊ वर्षात देशाची प्रचंड अधोगती झाली आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तरुणांच्या हाताला काम नाही व शेती मालाला योग्य दाम नसल्याने शेतकरी व तरुण वर्ग हवालदील झालेला आहे. महागाईने कळस गाठलेला आहे. डिझेल पेट्रोलचे दर प्रचंड वाढल्याने त्याचा सामान्यांना फटका बसलेला आहे. गॅस सिलेंडर सह गोरगरिबाच्या मूलभूत सोयी सुविधाचे दर प्रचंड वाढल्याने सामान्य लोकांना जगणे मुश्किल झालेले आहे. या सर्व बाबीला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. जाती जातीमध्ये भांडण लावुन आपली पोळी भाजण्याचे  काम भाजप सरकार करीत असून यापुढील सर्व निवडणुकीमध्ये भाजपाला हद्दपार करण्याचे आवाहन श्रीरंग चव्हाण  यांनी केले
यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव म्हणाले येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. प्रत्येक जिल्हा परिषद गटात अध्यक्ष तसेच समन्वयक नेमणे, बूथ कमिटी व ग्राम समिती स्थापना, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्याची माहिती संकलित करणे, तसेच गेल्या नऊ वर्षात केंद्रातील भाजप सरकारने घेतलेल्या विविध अन्यायकारक चुकीच्या निर्णयाविरुद्ध जनजागृती करण्याचे आवाहन डॉक्टर जाधव यांनी केले.
कॉंग्रेसचे सदस्य रणजितसिंह देशमुख यानी केंद्रातील मोदी सरकारवर कडाडून टीका केली. भाजपाच्या पापाचा घडा आता भरला असून पुणे येथील पोटनिवडणूक व कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसला मिळालेले यश यामुळे देशात पुन्हा मूळ लोकशाही येण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कॉंग्रेस हा पक्ष सर्व जाती जमातीना घेऊन बरोबर  काम करणारा हा एकमेव पक्ष आहे. माण तालुक्यात काँग्रेसच्या माध्यमातून आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जलसंधारणा बरोबरच, बंधारे तसेच विविध पाणीपुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी प्रचंड काम केले. तत्कालीन वेळी पृथ्वीराज बाबांचा फायदा घेणारे कॉंग्रेसशी  गद्दारी करून भाजपशी हातमिळवणी करून पृथ्वीराज बाबांचा विश्वास घात   करून कॉंग्रेसने केलेल्या कामाचे श्रेय – स्वत: घेत आहेत .   . आम्ही ज्यांना राजकारणात आणले त्यांनीच आमच्यावर उलट्या तंगड्या केल्या याबाबत रोष व्यक्त करून त्यांनी भाजपाचे स्थानिक आमदार यांच्यावर कडाडून टीका केली.
तालुकाध्यक्ष  बाबासाहेब माने म्हणाले काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माच्या कार्यकत्याला बरोबर घेऊन  येणाऱ्या सर्व निवडणूका पक्षाच्या आदेशानुसार ताकदीने लढविल्या जातील
या कार्यक्रमाला  सदाशिवराव पाटील, रविंद्र शिन्दे, पोपटराव शिन्दे धर्मराज जगदाळे विष्णुपंत अवघडे आप्पासाहेब कदम दिपक पोळ अजितराव कदम दिलीप हिरवे सर (OBC) तालुका-अध्ययक्ष उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!