प्रहार जनशक्ति पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी म्हसवड येथील अरविंद बापु पिसे यांची नियुक्ति
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
प्रहार जनशक्ति पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी म्हसवड येथील अरविंद बापु पिसे यांची नियुक्ति करण्यात आली असुन नुकतेच त्यांना प्रहार जनशक्ति पार्टी चे प्रमुख आ. बच्चु कडु यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
आ. बच्चु कडु यांचा प्रहार हा पक्ष राज्यातील दिव्यांगासाठी काम करीत असुन राज्यभरातील लाखो दिव्यांगाना या पक्षाने जगण्याची नवी उमेद दिली आहे. तर या पक्षाचे प्रमुख असलेल्या आ.बच्चू कडु यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील सध्याच्या सरकारने दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मीती केली आहे. आ. कडु यांच्या अनेक सामाजिक व लोकोपयोगी योजनांचा सर्वसामान्य जनतेला मोठा लाभ होत असल्यानेच त्यांच्या सोबत काम करण्याच्या उद्देशानेच म्हसवड येथील अरविंद पिसे यांनी निर्णय घेत गत ५ वर्षापासुन ते आ. कडु यांच्या सोबत माण तालुक्यात काम करीत आहेत.

पिसे यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातुन माण व खटाव या दोन्ही तालुक्यातील दिव्यांगाना शासकीय सर्व योजनांचा लाभ मिळवुन देण्याचे मोठे काम केले आहे, याशिवाय माण, खटावमधील सर्व सामान्य मजुर वर्ग, निराधार व्यक्ती, महिला, परितक्त्या आदींसाठी पिसे हे गत ५ वर्षापासुन अविरतपणे काम करीत आहेत. पिसे यांच्या सामाजिक कार्याचा म्हसवड शहरातील गोर गरीब जनतेला मोठा फायदा होत आहे. म्हसवड सारख्या ग्रामीण शहरात त्यांनी सर्वसामान्य मोलमजुरी करुन जगणाऱ्या वर्गाला हक्काची घरे मिळवुन देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबवत सुमारे साडे चारशे घरे बांधुन ती या वर्गाला उपलब्ध करुन दिली आहेत, तर शहरासह पंचक्रोशीतील सर्वसामान्य वर्गातील हुशार विद्यार्थ्यांसाठी ते शहरात गेली अनेक वर्ष मोफत अभ्यासिका राबवत आहेत, त्यांच्या या अभ्यासिकेतुन आज अनेक विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण झाले असुन आज प्रशासनात त्यांचे अनेक विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत. पिसे यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेत आ. बच्चु कडु यांनी त्यांना आपल्या संघटनेत घेत त्यांच्याकडे माण व खटाव या दोन्ही तालुक्याची जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी पिसे यांनी यशस्वीरित्या पार पाडल्यानेच त्यांच्यावर आता सातारा जिल्हाध्यक्ष पदाची नवीन जबाबदारी आ. कडु यांनी दिली आहे. पिसे हे आपल्याला दिलेली नवीन जबाबदारी लिलया पेलतील असा ठाम विश्वास पिसे यांच्या हजारो कार्यकर्त्यांना वाटतो आहे. तर आ. बच्चु कडु यांनी आजवरचे आपले काम पाहुन आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यामुळे मला नवी उर्जा मिळाली असल्याचे पिसे यांनी सांगत यापुढे मी आणखी जोमाने काम करुन सातारा जिल्ह्यात संघटना बांधणीचे कामाला गती देणार असल्याचे सांगितले.