अवैध्य धंद्यांचा कर्दनकाळ म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
BY ; Sadik Shekh
गोंदवले खुर्द;
           सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. समीर शेख सरांनी महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल दहिवडी पोलीस स्टेशनला बेस्ट पोलीस स्टेशन इन महिला पथदर्शी प्रकल्प हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.  पोलिसांना आणि पोलीस पाटील यांना काम करताना प्रेरणा मिळावी याकरिता श्री. अक्षय सोनवणे यांनी कामकाजाच्या स्वरूपानुसार बेस्ट पोलीस ऑफ द मंथ आणि बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ अशी रिवॉर्ड देण्याबाबत कार्यवाही चालू करून अंमलबजावणी देखील सुरू केली आहे.
                      ए.पी.आय. मा.श्री. अक्षय सोनवणे यांचे मुळगाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर मधील कोडीत आहे.लहानपणापासूनच कौटुंबिक परिस्थितीच्या अनुषंगाने वडील पुण्यात स्थायिक झाल्यामुळे श्री. अक्षय सोनवणे यांचे बालपण आणि संपूर्ण शिक्षण हे पुणे शहरांमध्ये झाले.. यांचे माध्यमिक शिक्षण यशोदीप विद्यालय वारजे माळवाडी, उच्च माध्यमिक शिक्षण मामासाहेब मोहोळ कॉलेज आणि त्यानंतरचे ग्रॅज्युएशन मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स येथे झाले.
 कौटुंबिक परिस्थिती मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने शिक्षणाच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि आई-वडील ,बहिण भाऊ आणि शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे २०११ साली MPSC च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पास होऊन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली..
       नाशिक येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर सर्वात पहिली पोस्टिंग कोकण परिक्षेत्र मधील ठाणे ग्रामीण येथे झाली.
त्या नंतर पालघर आणि रायगड अशा ठिकाणी पोलीस स्टेशनला कामकाज केले. या कालावधीत खून ,दरोडे तसेच इतर गंभीर क्राईमची प्रकरणे उघडकीस आणली.२०१७ साली दरोड्याचे  गुन्हे दाखल असलेला आणि ३ राज्यांना पाहिजे असलेला तसेच ३९ गुन्ह्यातील फरारी आरोपी याला वेशांतर करून स्वतःचा जीव धोक्यात घालून पकडले.
रायगड मध्ये नोकरी करत असताना नैसर्गिक आपत्ती चक्रीवादळ आल्यानंतर सात दिवस सतत कर्तव्य बजावून चक्रीवादळात अडकलेल्या लोकांची सुटका केली.
त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अशी पदोन्नती मिळाल्यानंतर सातारा जिल्ह्यात हजर होऊन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दीड वर्ष कामकाज केले.
या दीड वर्षांच्या कालावधीतील केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल बेस्ट डिटेक्शन चे 26 अवॉर्ड बक्षीस मिळाले..
 त्यानंतर सध्या दहिवडी पोलीस स्टेशनला मागील पाच महिन्यांपासून प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज बघत आहे.
आई-वडिलांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे गोरगरीब आणि पीडित जनतेला योग्य न्याय कसा मिळेल या दृष्टीने कामकाज करणे बाबत नेहमीच प्रयत्न चालू असतात. तसेच समाजातील अवैध्य धंदे करणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक यांच्यावर आळा बसावा याकरिता त्यांच्यावर कारवाई करणे, दारू, मटका ,जुगार ,गांजा यांसारख्या रेड करणे हे मुख्य ध्येय समोर ठेवून कामकाज चालू आहे..
 या अनुषंगाने सांगायचे म्हटले तर दहिवडी पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर दोनच दिवसात सातारा जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी गांजाची रेड स्वतः केली तसेच जुगार आणि मटका खेळणाऱ्या इसमांवर सुद्धा सर्वात मोठी रेड करून ताब्यात घेतले. वाहतूक कोंडी कमी व्हावी, नागरिकांना वाहतुकीबाबत शिस्त लागावी याकरिता रहदारीस अडथळा करणाऱ्या लोकांवर दहिवडी पोलीस स्टेशनचा कारभार हाती घेतल्यापासून जवळपास 200 पेक्षा जास्त गुन्हे दाखल केलेले आहेत.
शाळेतील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे तसेच निर्भया पथकाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करणे, मुली आणि महिलांना समाजात वावरताना सुरक्षित वाटावे याकरिता सातत्यपूर्ण प्रयत्न चालू असतात.या अनुषंगाने कॉलेज परिसर, एसटी स्टँड परिसर, बाजार परिसर येथे उपद्रव करणाऱ्या, त्रास देणाऱ्या लोकांवर कारवाया चालू असतात .. तसेच सध्याची नवयुवक तरुण पिढी बिघडली नाही तर ती घडली पाहिजे असा मानस ठेऊन नवतरुण युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात त्यांना आनंद मिळतो. युवा पिढी ने स्पर्धा परीक्षा देऊन यश संपादन केले पाहिजे अशी त्यांची तळमळ असते.
भविष्यात देखील महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावेल या करिता सातत्यपूर्ण कामगिरी चालूच ठेवणार असून याकरिता जनसामान्यांचे प्रश्न सोडवणे,त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणे हेच मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवलेले असून त्या अनुषंगाने सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज चालू आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!