एस.टी.च्या सर्व स्थानिक फेऱ्या बंद, म्हसवड पंचक्रोशीतील प्रवाशांचे हाल सर्व फेऱ्या तातडीने सुरू कराव्यात प्रा. विश्वंभर बाबर
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड….प्रतिनिधी
म्हसवड बस स्थानका अंतर्गत च्या एसटी च्या स्थानिक सर्व फेऱ्या दहिवडी आगाराने बंद केल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून म्हसवड पंचक्रोशीतील नागरिकांना कोण वाली आहे का ? असा सवाल प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केला आहे.
म्हसवड बस स्थानकावरील प्रवाशाचे हाल भयानक असल्याने याबाबत प्राध्यापक बाबर यांनी आवाज उठवला असून याबाबत जिल्हा एसटी प्रशासनाकडे विचारणा केली आहे. म्हसवड पंचक्रोशीत अंदाजे 50 लहान मोठी गावे आहेत. या 50 गावात साधारणता आठ प्रमुख रस्ते आहेत. एका रस्त्याच्या माध्यमातून साधारणता सहा ते सात गावे कव्हर होतात. म्हसवड बस स्थानकातून या प्रमुख रस्त्यावर सुरू असणाऱ्या एसटीच्या बहुतेक सर्व फेऱ्या दहिवडी आगाराने बंद केलेल्या असल्याने प्रवाशांमध्ये एसटी प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी पसरली असल्याचे बाबर यांनी सांगितले.
याबाबत बोलताना प्रा. बाबर म्हणाले म्हसवड विरळी, म्हसवड खरसुंडी, म्हसवड इंजबाव, म्हसवड संभुखेड, म्हसवड माळशिरस व्हाया भटकी , म्हसवड शिंगणापूर, म्हसवड हिंगणी , तसेच म्हसवड देवापूर वरकुटे मलवडी इत्यादी ठिकाणी स्थानिक एसटी फेरीच्या माध्यमातून दररोज हजारो प्रवाशांना एसटीच्या सेवेचा लाभ होत होता. गेल्या आठ ते दहा दिवसापासून म्हसवड बस स्थानक अंतर्गतिच्या बहुतेक सर्व फेऱ्या, तसेच मुक्कामी एसटी सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. श्रीमंत प्रवासी चार चाकी दोन चाकी वरून ये जा करतील मात्र गरिबांच्या प्रवासाचे काय ? असा सवाल प्राध्यापक बाबर यांनी केला असून याबाबत राजकीय नेते मूग गिळून गप्प का आहेत असा प्रश्न बाबर यांनी केला आहे. दहिवडी बस स्थानका अंतर्गत च्या च्या गावाला एक न्याय मात्र म्हसवड बस स्थानका अंतर्गत गावांना सावत्रपणाची वागणूक का ?
याबाबत लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का,? म्हसवड परिसरातील 50 गावातील प्रवाशांचे हित लक्षात घेता दहिवडी आगाराने आठ दिवसांपूर्वी बंद केलेल्या एसटीच्या सर्व फेऱ्या व मुक्कामी सुविधा तातडीने सुरू कराव्यात अन्यथा एसटी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रा विश्वभर बाबर यांनी दिला आहे .