ग्रामीण मराठी व माणदेशी लेखक अजित काटकर यांनी माणदेशात लेखन परंपरा जोपासण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन म्हसवड नगरवाचनालयाचे अध्यक्ष नितीनभाई दोशी यांनी केले. ते म्हसवड नगरवाचनालयास अजित काटकर यांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांचा संच भेट देण्याच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी वाचनालयाचे कार्यवाह सुरेश उबाळे, शिक्षक संघटनेचे जेष्ठ नेते सुभाष शेटे बापू,मुख्याध्यापक रमेश सुर्यवंशी, व्यवसायिक विजय धोत्रे उपस्थित होते.
नितीन दोशी पुढे म्हणाले की माणदेशात अनेक नामांकित लेखक होऊन गेले आहेत त्यांचे लेखन आजही जनमाणसाच्या मनावर आधिराज्य वाजवीत आहे. ती लेखन परंपरा जागवण्याचे काम अजित काटकर यांच्यासारख्या लेखकांकडून सुरु आहे. काटकर सर हे गणित विज्ञान विषयाचे शिक्षक पण त्यांनी मराठी वाड:मयात खास करुन ग्रामीण मराठी भाषेतील साहित्यात मोठी भर घातली आहे.त्यांची आजपर्यंत १५ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या लेखनाचा खास चाहता वर्ग आहे.
यावेळी बोलताना अजित काटकर यांनी सांगीतले की मला वाचकच्या छंदातुन लेखनाची उर्मी प्राप्त झाली. भरपुर वाचन केल्यानंतर आपणही लिहावे असे वाटू लागले. आजपर्यंत मी १५ पुस्तके लिहिली पाच चित्रपटकथा लिहिल्या त्याचप्रमाने प्रतिलिपी अॅपवर माझ्या पन्नास कथा प्रसिद्ध झाल्या असुन एक लाजावे लोकांनी त्या वाचल्या आहेत. यू ट्युबवर अनेक कथा असून २५ हजारांवर लोकांनी त्या ऎकल्या आहेत.जेव्हा एखादा वाचक कथा आवडल्याचे कळवतो तेव्हा लेखनासाठीची ताकद वाढते.
कार्यक्रमासाठी अहिंसा पतसंस्थेचे मॅनेजर हरिदास मासाळ,हरिदास विरकर,बाबु मुल्ला, ग्रंथपाल सुनील राऊत, माने सर,यांच्यासह अनेक वाचक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यवाह सुरेश उबाळे यांनी प्रास्ताविक केले.सुनिल डोंगरे सर यांनी आभार मानले.