राज्यसरकारचाअर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला भोपळा आहे : प्रा.कविता म्हेत्रे * सोलापूर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने भोपळा आंदोलन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
By ;Ahmad Mulla
म्हसवड
         राज्यात महागाई येवढी वाढलेली आहे आम्हाला विष खायला पैसा नाही आणि राज्यसरकारचा अर्थसंकल्प हा पंचामृत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस सांगत आहेत  अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला भोपळा आहे असे उद्  गार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प.महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा.कविता म्हेत्रे यांनी काढले
                  सोलापूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने  भोपळा आंदोलन करण्यात आले याप्रसंगी कविता म्हेत्रे बोलत होत्या यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प.महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा.कविता म्हेत्रे ,सोलापूर अध्यक्ष सुनीताताई रोटे,माजी महापौर नलिनी चंदेले, शहराध्यक्ष भरत जाधव युवक अध्यक्ष जुबेर बागवान,लताताई फुटाणे,शशिकला कसप्टे,संगीता जोगधनकर  सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
या प्रसंगी बोलताना कविताताई म्हेत्रे पुढे म्हणाल्या  महागाईने आमचे कंबरडे मोडले आहे त्यात पुन्हा गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आम्ही महिलांनी काय करायचं आणी सरकारचा जो अर्थसंकल्प आहे तो नुसता  भोपळा आहे तो या अर्थाने की यात नुसता घोषनांचा पाऊस आहे  त्याला  फडणवीस साहेब पंचामृत म्हणतात  पंचामृत कोणी पाहिले आहे इकडे महागाईने आमचे कंबरडे मोडले असून आमच्याकडे विष खायला पैसा नाही  महागाईने जनता त्रस्त झाली आहे   हे या मिंधे सरकारला दिसत नाही काय हे सरकार महागाईवर काही बोलत नाही ,गॅस दरवाढीवर बोलत नाही हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे   बेटी बचाव बेटी पढावचा नारा देणाऱ्या मोदी साहेबांना महिलांच्या डोळ्यातील अश्रु दिसत नाहीत काय? त्यामुळेच आज आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आली  येणाऱ्या काळात याच महिला या मुजोर सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही  असही शेवटी कविताताई म्हेत्रे यांनी शिंदे फडणवीस सरकारला  ठणकावून सांगीतले

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!