आयुष्यात वाटचाल करताना मार्क (गुण) आणि ज्ञान याची गल्लत करु नका; सुरेश गोडसे

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड
 By ; दौलत नाईक (प्रतिनिधी )
दहिवडी :
        विद्यार्थ्यांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करुन आयुष्यात वाटचाल करताना मार्क (गुण) आणि ज्ञान याची गल्लत करु नका असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी सुरेश गोडसे यांनी केले.
    मलवडी (ता. माण) येथील  दहावी शुभ चिंतन व बारावी निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जनरल बाॅडी सदस्य सुभाष सस्ते, सरपंच दिपाली जगदाळे, मुख्याध्यापक मनोहर तांबे, पर्यवेक्षक अशोक पवार, रमेश इंगळे, जनार्दन सुर्यवंशी, तुळशीराम बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते.
        सुरेश गोडसे म्हणाले, दहावी व बारावीनंतर आयुष्यात अनेक संधी उपलब्ध होतात. त्यामुळे कोणतीही एकच गोष्ट केली पाहिजे असं नाही. परंतू जे कराल ते प्रामाणिकपणे करा. यशस्वी प्रयत्नांनाच किंमत असते हे लक्षात घ्या. सुभाष सस्ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रामाणिक राहून प्रयत्नशील राहिले पाहिजे. जिद्द व चिकाटी अंगी बाणवली तर यश मिळतेच.  गुरुसिध्द शेळके व आनंदराव घनवट यांनी शिक्षक तर प्राची रजपूत, संजीवनी मदने व संजना सस्ते, प्रिया इंगळे यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त केले.
     श्रीमंत भोसले यांनी सुत्रसंचालन केले. अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले तर जगन्नाथ मदने यांनी आभार मानले.
……..

लवडी, ता. माण : इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू दिल्या.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!