पळशी फाटा ते पळशी रस्त्याचा पुन्हा शुभारंभ अखेर ठेकेदाराला आंदोलाच्या बडग्याने मुहूर्त सापडला, रस्त्याचे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थ समाधानी
व्हिजन२४तास न्यूज म्हसवड
By; दौलत नाईक
दहिवडी/प्रतिनिधी:
पळशी फाटा ते पळशी रांजणी रस्ता हे चार वर्ष रखडलेल्या कामासंदर्भात पळशी ग्रामस्थांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाराने सदर ठेकेदाराने तातडीने डांबरीकरणाचे काम पळशी फाटा ते पळशी गावापर्यंत चालू केलेले आहे.
पळशी गावचा रस्ता ठेकेदाराने उखडून ठेवलेला,रांजणी व्हाया पळशी रस्ता पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी होतअसताना.रांजणी ते पळशी फाटा (सातारा पंढरपूर रोड) रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडलेले होते.हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी गेल्या चार वर्षांपूर्वी हा रस्ता ठेकेदाराने संपूर्ण पणे उखडून टाकलेला होता.त्यामुळे पळशी ग्रामस्थ,प्रवाशी,वाहनधारक यांना या रस्त्यावरून खडी तुडवत उखडलेल्या धुरळ्यामध्ये जीव मुठीत धरून वाहने चालवून प्रवास करावा लागत होता.हा रस्ता अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारावर शासनाने कडक कारवाई करण्याबाबतचे लेखी निवेदन पळशी ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या वतीने दिनांक २४ फेब्रुवारी रोजी पळशी गावच्या विद्यमान सरपंच मा.सौ.शांताबाई मधुकर खाडे यांनी माण तालुक्याचे तहसीलदार मा.श्रीशैल्य वट्टे यांना दिले होते.या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अन्यथा १ मार्चला आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील पळशी गावच्या विद्यमान सरपंच मा.सौ.शांताबाई खाडे यांच्यासह ग्रामस्थांनी दिलेला होता.
सातारा पंढरपूर रस्त्यालगत मिळणारा रांजणी ते पळशी फाटा हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात येणार आहे.हा रस्ता करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने चार वर्षांपासून संपूर्ण रस्ता उखडून टाकलेला होता.रस्ता उखडून मुरुमीकरण करून त्यावरती खडीकरण करण्यात आलेले होते.मात्र यावरचं रस्त्याचे काम बंद पडले होते.रस्त्यावरती टाकलेली खडी ही पूर्णपणे अस्ताव्यस्तपणे उखडलेली होती.या उदासलेल्या खडीवरून वाहन धारकांना जीव मुठीत धरून कसरत करीत वाहने चालवावी लागत होती.कधी-कधी उखडलेल्या खडीच्या रस्त्यावरून अनेक वाहने घसरून छोटे-मोठे अपघात देखील घडलेले आहेत.पळशी गावापासून सातारा-पंढरपूर रस्त्याला मिळणाऱ्या पळशी फाट्यापर्यंत अगदी उखडलेल्या खडीतून धुरळा उडवीत अजूनही ग्रामस्थ्यांना व प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.हा उडालेला धुरळा रस्त्यालगतच्या दुकान व घरात घुसत होता.दुकाने व घरातील मौल्यवान वस्तू खराब होऊ लागलेल्या.या धुळीचा परिणाम लहान मुले व वयोवृध्द यांच्या आरोग्यावरती होऊन आजारी पडत होते.मोठ्या प्रमाणात धुरळा उडत असल्याने आजू बाजूच्या रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले होते.त्याचा दुष्परिणाम नागरिकांना भोगावा लागत होता.तरी या अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे या संबंधित त्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून काम अपूर्ण ठेवणाऱ्या बेजबाबदार ठेकेदारावरती योग्य ती कारवाई करावी.असे लेखी निवेदन देण्यात आले होते.पळशीकरांनी दहीवडीला येण्या-जाण्याचे मार्ग देखील बदललेले आहेत.दहिवडीला जाणारा हा पळशीचा मुख्य रस्ता नवीन बनविण्यासाठी ठेकेदाराने हा रस्ता उखडून ठेवल्याने हा रस्ता अपघाताचा सापळा बनलेला होता.दुरावस्था झालेल्या रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताला निमंत्रण नको या कारणांनी अनेकांनी आपले मार्गच बदलले होते.दहिवडीला येण्यासाठी सध्या अनेकजण मनकर्णवाडी मार्गे लोधवडे फाट्यावरून जातात.तर काही जन गावातून म्हसोबा मंदिर मार्गे माने वस्ती ते धामणी फाटा या पर्यायी रस्त्याचा वापर प्रामुख्याने करताना दिसत आहेत.मार्ग बदलताना वाहनांना डीझेल,पेट्रोल अधिकतम जाळावे लागत असल्याने वाहधारकांच्या खिशाला जादा चाट बसत होता.या रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी पळशीच्या सरपंच सौ.शांताबाई खाडे,पळशी गावचे पोलीस पाटील श्री.यशवंत गंबरे,भाजपचे माण तालुका सरचिटणीस व नियोजन समितीचे माजी सदस्य श्री.बाळासाहेब खाडे,माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुका उपाध्यक्ष डॉ.श्री.भास्कर खाडे,सामाजिक कार्यकर्ते श्री.चंद्रकांत गंबरे,बंडू हांगे,संजय गंबरे,सुर्यकांत खाडे,दिलीप गंबरे, शिवाजी खाडे,व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.