पळशी रस्ता पूर्ण न केल्यास रास्ता रोको करणार : सरपंच शांताबाई खाडे* *पळशीचा रस्ता ठेकेदाराने उखडून ठेवला*, *रांजणी व्हाया पळशी रस्ता पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी.*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
By ;दौलत नाईक
दहिवडी/प्रतिनिधी
                            रांजणी पळशी ते सातारा पंढरपूर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम  गेल्या चार  वर्षांपासून रखडले आहे. हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी गेल्या चार  वर्षांपूर्वी ठेकेदाराने संपूर्णपणे उखडून टाकला आहे. त्यामुळे पळशी ग्रामस्थ, प्रवाशी वाहनधारक यांना या रस्त्यावरून खडी तुडवत उडालेल्या धुरुल्यात जीव मुठीत धरून वाहने चालवून प्रवास करावा लागत आहे. रस्ता अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारावर शासनाने कडक कारवाई करून या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अन्यथा १ मार्चला आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरपंच शांताबाई खाडे यांच्यासह  ग्रामस्थांनी दिला आहे.
   सातारा पंढरपूर रस्त्याला  हा मिळणारा रांजणी ते पळशी फाटा हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. हा रस्ता करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने चार  वर्षांपूर्वी उखडून टाकला आहे, रस्ता उखडून त्यावर मुरुमीकरण करण्यात आले व त्यावर खडीकरण करण्यात आले. मात्र यावरच रस्त्याचे काम बंद पडले आहे. रस्त्यावर टाकलेली खडी पूर्णपणे अस्ताव्यस्तपणे उखडली असून या उदासलेल्या खडीवरून वाहनधारकांना जीव मुठीत धरून कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. कधी कधी उखडलेल्या खडीच्या रस्त्यावरून अनेक वाहने घसरून छोटे मोठे अपघात घडले आहेत.
    पळशी गावापासून सातारा पंढरपूर रस्त्याला मिळणाऱ्या पळशी फाट्यापर्यंत अगदी उखडलेल्या खडीतून धुरळा उडवीत प्रवास करावा लागत आहे. हा उडालेला धुरळा रस्त्यालगतच्या दुकान व घरात घुसत आहे,दुकाने व घरातील मौल्यवान वस्तू खराब होऊ लागल्या आहेत. या धुळीचा परिणाम लहान मुले व वयोवृध्द यांच्या आरोग्यावर होऊन आजारी पडत आहेत. मोठ्या प्रमाणात  धुरळा उडत असल्याने  आजू बाजूच्या रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचा दुष्परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे. तरी या अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून काम अपूर्ण ठेवणाऱ्या बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी.
  *पळशीकरांनी दहीवडीला येण्याजाण्याचे मार्ग बदलले*
दहिवडीला जाणारा हा पळशीचा मुख्य रस्ता नवीन बनविण्यासाठी ठेकेदारांने उखडून ठेवल्याने या रस्ता अपघाताचा सापळा बनला आहे. दुरावस्था झालेल्या रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताला निमंत्रण नको या कारणांनी अनेकांनी आपले मार्गच बदलले आहेत. दहिवडीला येण्यासाठी सध्या अनेकजण मनकर्णवाडी मार्गे लोधवडे फाट्यावरून जातात. तर काही जन गावातून म्हसोबा मंदिर मार्गे माने वस्ती ते धामणी फाटा या पर्यायी रस्त्याचा वापर प्रामुख्याने करताना दिसत आहेत. मार्ग बदलताना वाहनांना डीझेल पेट्रोल अधिकतम जाळावे लागत असल्याने वाहधारकांच्या खिशाला जादा चाट बसत आहे.
   *सरपंच शांताबाई खाडे यांनी तहसीलदार यांना दिले निवेदन*
पळशीच्या सरपंच सौ. शांताबाई खाडे,उपसरपंच केशव खाडे, डॉ.भास्कर खाडे,   ग्रामपंचायत सदस्य फुलाबाई साबळे, मानसिंग खाडे, संजय गंबरे, सुर्यकांत खाडे, विष्णू खाडे, विशाल नाकाडे, दिलीप गंबरे, शिवाजी खाडे, आदींनी आंदोलनाचे निवेदन माणचे तहसीलदार यांना दिले. निवेदनात म्हटले आहे, पळशी फाटा ते रांजणी हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमधून गेल्या चार वर्षापुर्वी मंजूर झाला असून या रस्त्याचे काम ठेकेदारांने अर्धवट करून सोडून दिले आहे. हे काम तातडीने सुरु करून पूर्ण करण्यात आले नाही तर पळशी फाट्यावर सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. तसेच तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून पळशी ग्रामस्थांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. अन्यथा दि. १ मार्च रोजी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!