शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करणाऱ्याचे हातपाय तोडू; बच्चू कडूंचा इशारा
व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड
By; सकाळ डिजिटल टीम
यावेळी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “शेतकऱ्यावर ही वेळ यायला नाही पाहिजे. सरकारने लुटलं जास्त दिलं कमी. शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्येच्या दारात नेण्याचा हा प्रयत्न आहे. मी कलेक्टरशी फोनवर बोललो, आत्ताही चर्चा झाली. १५ दिवसांत पुन्हा आम्ही चर्चा करू. लिलाव कऱण्याची पद्धत आम्ही हाणून पाडू. जो लिलाव घेईल, त्याचे हातपाय तोडू.”
जिल्हा बँकेच्या प्रशासकांना इशारा देताना बच्चू कडू म्हणाले, “शेतकऱ्याची जमीन जर कोणी लिलावात घेतली तर हात पाय पाडू. जे काही असेल तर सरकारशी बोलू. खासगी सावकारीची पद्धत जिल्हा मध्यवर्ती बँकेत चालत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही.”