हुकूमशाही मोदी सरकारला हद्दपार करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी बनवणाऱ्या व सर्वसामान्य जनतेला क्रूर भावनेने महागाईच्या झळा सोसायला लावणाऱ्या हुकूमशाही मोदी सरकारला हद्दपार करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केले. यावेळी नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून खटाव माण तालुक्यात काँग्रेस पक्षाची वज्रमूठ बांधून पक्षाची पुनर्बाधणी करण्याचा निर्धार करण्यात आला.
वडूज येथील फिनिक्स ऑर्गनायझेशन सभागृहात आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, डॉ. महेश गुरव, सत्यवान कमाने, विजय शिंदे, राहुल सजगणे, इम्रान बागवान, परेश जाधव, राजुभाई मुलाणी, राजु माने आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी देशमुख म्हणाले की गेल्या काही दिवसांत ज्या अदाणी, विजय माल्या अशा अनेकांनी देशांच्या संपत्तीची लूट केली अशा लुटारूंना हे सरकार पाठीशी घालत आहे. या सरकारला हदपार करण्याची हीच वेळ आहे. भाजपला हद्दपार करण्यासाठी काँग्रेसचे विचार गावागावात पोहोचवणार व गाव तिथे शाखा उभारून काँग्रेसची पाळेमुळे घट्ट करणार व भाजपची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी काँग्रेसच्या वतीने हातसे हात जोडो अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचे काम करणार आहे. स्वातंत्र्य चळवळीत ज्या गांधी घराण्याचा त्याग आहे अशा त्यागी लोकांना देशाची सेवा करण्याची संधी देण्याची गरज असून या भाँगी व ढोंगी भाजपला हाद्दपार करण्याची हिच वेळ आहे असे देशमुख म्हणाले .
डॉ. संतोष गोडसे म्हणाले तालुक्यात व तालुक्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या वडूज नगरी मधील विविध प्रश्नांवर सर्वांना सोबत घेऊन लवकरच काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जन आंदोलने केली जातील.
डॉ. महेश गुरव म्हणाले की यापुढे भाजपची नौटंकी चालू देणार नाही दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय स्वतःच्या माथी मारून घ्यायची सवय भाजपला लागली आहे असे गुरव बोलताना म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यवान कमाने यांनी केले. सूत्रसंचालन विजय शिंदे यांनी केले.तर आभार अमरजीत कांबळे यांनी मानले या प्रसंगी माजी सरपंच सदाशिव खाडे, जोतिराव बागल, आकाराम खाडे, निलेश घार्गे, सवाजी सुर्वे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.