महिला स्वकर्तृत्वावर सक्षमपणे उभ्या आहेत: प्रा. कविता म्हेत्रे पळशीकर महिला विचार मंचच्या सौजन्याने जागतिक महिला दिन साजरा प्रश्नमंजुषेचा कार्यक्रमातून पैठणी भेट,

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
By;दौलत नाईक 
      दहिवडी /प्रतिनिधी  : आजच्या या एकवीसाव्या शतकामध्ये स्त्री-पुरुष समानता पाहता या दोघांनाही कमी लेखता कामा नये.ज्यावेळी दोघांनाही समानतेने आणि हक्काने या समाजामध्ये खऱ्या अर्थाने जगता येईल त्याचं दिवशी ही स्त्री-पुरुष सामानता दिसून येईल. आता महिला  स्वकर्तृत्वावरती सक्षमपणे उभ्या आहेत असे प्रतिपादन युवा व्याख्यात्या  प्रा. कविता म्हेत्रे यांनी केले.
   पळशी ता. माण येथील श्री.हनुमान विद्यालयामध्ये  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवचैतन्य महिला मंच व श्री.हनुमान विद्यालयाचा  संपूर्ण शिक्षक स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
   यावेळी व्यासपीठावर लोकनियुक्त सरपंच सौ.शांताबाई खाडे,  ड्रीम सोशल फाउंडेशन,पुणे संस्थापक-अध्यक्षा सौ.अनुराधा देशमुख, महाराष्ट्र शासन वनश्री पुरस्कार प्राप्त कु.रक्षिता बनसोडे , चेअरमन श्रीमती जनाबाई खाडे, मुख्याध्यापक श्री.एस.आर ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते..
  कविता म्हेत्रे म्हणाल्या, महिलांविषयीची प्रेरणा किंवा त्यांचे कौतुक हे फक्त एकाचं दिवशी म्हणजेच जागतिक महिला दिनादिवशीचं करणे व इतर वेळेस फक्त तिने चूल आणि मुलं सांभाळणे ही परिस्थिती सध्या पूर्णपणे बदललेली आहे ती आता स्वकर्तृत्वावरती सक्षमपणे उभी राहिलेली दिसून येतेय. तसेच आपण नेहमीचं म्हणत असतो की एका कर्तबगार पुरुषामागे एक स्त्री नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभी असते परंतू एका स्वकर्तृत्वान स्त्रीच्या पाठीमागे देखील एका कर्तबगार पुरुषाने पाठीशी उभे असणे तितकेच महत्वाचे आहे.ज्या दिवशी या पृथ्वीतलावरती जागतिक महिला दिन साजरा होताना दिसणार नाही तोचं दिवस खऱ्या अर्थाने महिला दिन म्हणून आपण सन्मानाने साजरा करू शकतो.
    सौ.अनुराधा देशमुख म्हणाल्या, आपण ज्या प्रगती पथावरती चाललोय त्याचे संस्कार आपल्याला घरातून पेरले जातात.मुलींच्या शिक्षणाबरोबरचं योग्य प्रकारे मुलींना संस्कार देणेही तितकेच महत्वाचे आहे.
      संचिता खाडे या विद्यार्थिनीने देखील आपले मनोगत करताना सांगितले,खरंतर एवढ्या मोठ्या लोकसंखेचे गाव असून या गावात कधीच महिलांसाठी असलेला जागतिक महिला दिन साजरा झाला नाही.त्यामुळे सर्वसामान्य महिलेचा आणि,विशेष क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या महिलांचा सत्कार घेऊन महिलांसाठी काहीतरी नवीन उपक्रम करण्याच्या भूमिकेतून हा कार्यक्रम नियोजित झाला.
  दरम्यान, या कार्यक्रमासाठी गावातील संपूर्ण महिलांचा एक गट तयार केला आणि त्यातून उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या महिलांची नावे निवडली.यातून अध्यक्षपदासाठी धाडसी आणि धडाडीने काम करणाऱ्या उच्चशिक्षित तसेच प्रत्येक सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सौ.शुभांगी सागर नाकाडे यांची नवं-चैतन्य महिला मंच यांच्या वतीने एकमताने निवड करण्यात आली.
   शिक्षिका  सौ.विद्या खाडे,सौ.हेमलता खाडे,सौ.अश्विनी खाडे यांच्या नियोजनाने कार्यक्रमाची तयारी झाली तर नवचैतन्य महिला मंच मधील सौ.पायल मुलानी,सौ.भाग्यश्री खटावकर,सौ.सुवर्णा कुलकर्णी, सौ.निलम नाकाडे,सौ.संध्या खाडे यांचे सहकार्य लाभले.यामध्ये आलेल्या सर्व महिलांसाठी खुली प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता.महिलांना आरोग्य संबंधीचे आणि दैनंदिन व्यवहारातील प्रश्न विचारण्यात आले.यासाठी तीन मानाच्या पैठणी साड्या होत्या.त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे कादंबरी कलेक्शनच्या सौ.पूनम भांड यांच्याकडून,द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कल्याणी कलेक्शनच्या सौ.माया भोगले,तृतीय क्रमांकाचे बक्षीस समिधा कलेक्शनच्या सौ.सुजाता खाडे यांच्याकडून देण्यात आले.या प्रश्नमंजुषा कार्यक्रमातील विजेत्या महिला म्हणून प्रथम क्रमांक सौ.संवादवी खाडे,द्वितीय क्रमांक सौ.प्रिया खाडे तृतीय क्रमांक,सौ.सुरेखा खाडे या महिलांनी मिळवला.
   यावेळी या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक .श्री.खाडे एन.डी व खाडे एस.डी तसेच,राऊत सर,शिपाई एम.बी.सावंत मामा यांचे विशेष सहकार्य मिळाले.प्रास्तविक  सौ.ए.आर.खाडे  यांनी केले तर आभार सौ.एच.आर.खाडे यांनी मानले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!