अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, तो आजचा विषय नाही; सत्तारांचं विधान

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड( अहमद मुल्ला )

By;सकाळ डिजिटल टीम

Published on : 12 March 2023

मुंबईः

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सतत नाना तऱ्हेच्या विधानाने चर्चेत असतात. आज त्यांनी शेतकरी आत्महत्येबाबत एक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

गारपीठीमुळे शेतकऱ्यांचं मोठं झालं आहे. सोयगाव येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहाणी केली. त्यानंतर बोलतांना सत्तार म्हणाले की, शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांना मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

सत्तार म्हणाले की, नुकसानीची पाहाणी करण्यासाठी मी आलो होतो. माझ्या मतदारसंघात फिरुन आलो. शेतीचं फारकाही नुकसान झालेलं नाही. पहिल्या माहितीनुसार अजिबात नुकसान झालेलं दाखवलं नव्हतं. त्यामुळे वस्तूनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जावून आलो. मोठं नुकसान नसलं तरी पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे निर्देश दिल्याचं अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

  • शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही
  • अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात
  • माझ्या मतदारसंघात फिरुन आलो, शेतीचं फार नुकसान झालं नाही
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार
  • पहिल्या माहितीनुसार नुकसान नव्हतं
  • वस्तूनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जावून आलो
  • मोठं नुकसान नाही परंतु जे नुकसान झालं त्याचं पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!