योद्धा प्रतिष्ठानतर्फे अकलूज शहरातील विविध प्रलंबित मागण्या त्वरीत पूर्ण करण्यासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले
त्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अकलूज शहरातील महात्मा फुले भाजी मंडईचे सुशोभीकरण करावे व लोकांना बसण्यासाठी शेडचे दुरुस्तीकरण करावे, ठीक-ठिकाणी मुतारी उभाराव्यात, शिवसृष्टी किल्ला नगरपरिषदेने आपल्या ताब्यात घावा, निकृष्ट दर्जाचे रस्ते करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारांवर कारवाई करण्यात यावी.
या प्रलंबित प्रश्नांवर अनेक वेळा निवेदने देऊन आंदोलन करून ही कार्यवाही करण्यात आली नाही तरी प्रांताधिकारी नामदेव टिळेकर साहेब यांना शेखरभैय्या खिलारे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी १८ जानेवारी रोजी चर्चा करून निवेदन दिले आहे.मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ही देण्यात आला आहे.
त्यावेळी करण कांबळे,बिपिन बोरावके,संपत खिलारे,पपुभाऊ मिसाळ( विद्रोही अध्यक्ष),अविनाश सोनवणे,केशवभाऊ लोखंडे,शिवराम गायकवाड,शिवदत्त नामदास,अशिफ शेख, इत्यादी उपस्थीत होते.तरी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन प्रांताधिकारी यांनी दिले आहे.