म्हसवड ( दिलीपराज कीर्तने ) गेल्या 45 वर्षापासून सुरू असणारी कागल ते म्हसवड ही राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा अचानकपणे बंद झाली असून सदर बस तातडीने पूर्ववत सुरू करावी अशी मागणी किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन महाराष्ट्राचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक मंत्रालय मुंबई , मुंबई सेंट्रल परिवहन विभाग कार्यालय मुंबई , विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ सातारा जिल्हा सातारा, तसेच आगारप्रमुख कागल यांच्याकडे प्रा. विश्वंभर बाबर यांनी दिले आहे. कागल ते म्हसवड ही बस सेवा गेली 45 वर्षापासून सुरू आहे. या मार्गावर माण खटाव मधील अनेक गावे असून या गावातील प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी सदर बस सेवा अत्यंत उपयोगी आहे. सदर बस अंदाजे पंधरा दिवसां पासून अचानकपणे बंद केल्याने शालेय विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. ऐन इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कालावधीत ही बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थी, पालक तसेच स्थानिक प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विद्यार्थी हित लक्षात घेता सदर बस सेवा तातडीने सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृषिरत्न इशारा विश्वंभर बाबर यांनी दिला आहे. ========================