अहिंसा पतसंस्थेच्या लॉकर सुविधेमूळे सभासदांना दिलासा – गोल्डन मॅन श्री शंकरभाई विरकर यांची प्रेरणादायी उपस्थिती
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला
म्हसवड
मीरा भाईंदर – अहिंसा पतसंस्थेत नुकत्याच पार पडलेल्या लॉकर पूजन कार्यक्रमाने सभासदांच्या आर्थिक सुरक्षेला नवा आयाम दिला आहे. या खास प्रसंगी भाजपा नेते व सुवर्णपुरुष म्हणून ओळखले जाणारे श्री शंकरभाई विरकर यांच्या हस्ते लॉकर पूजन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष व संस्थेचे चेअरमन श्री नितिनभाई दोशी होते.
कार्यक्रमात श्री शंकरभाई विरकर यांनी आपल्या मनोगतात अहिंसा पतसंस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी संस्थेच्या चौफेर प्रगतीसाठी शुभेच्छा देताना सांगितले की, “संस्थेने सभासदांच्या हिताचे अनेक उपक्रम सुरू ठेवले आहेत. संस्थेचे उत्पन्न वाढल्याने ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, ज्याचा लाभ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना व सभासदांना होईल. कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करणे महत्त्वाचे आहे.”
सभासदांना लॉकरसारख्या अत्याधुनिक सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. अहिंसा पतसंस्थेने ग्रामीण भागातील सभासदांनाही आर्थिक सुरक्षिततेसाठी अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
संस्थेचे चेअरमन नितिनभाई दोशी यांनी कार्यक्रमात आनंद व्यक्त करत सांगितले की, “आजचा दिवस दुग्धशर्करा योगासारखा आहे. लॉकर पूजनाचा मान ज्यांच्या अंगावर सोन्याचा मुलामा आहे तसेच सोन्यासारख्या स्वभावाचे श्री शंकरभाई विरकर यांना मिळाला आहे, हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “बनगरवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन मीरा भाईंदरमध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रात शंकरभाईंनी केलेली प्रगती प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचे सुवर्णाक्षरात वर्णन केले जावे, अशीच आमची इच्छा आहे.”
लॉकर पूजनाच्या या कार्यक्रमात संस्थेचे माजी संचालक नारायण माने, अशोक नामदे, व्यवस्थापक दिपक मासाळ, प्रशांत आहेरकर, महेश पतंगे, नीरज व्होरा, अमजद मुजावर, नाना मासाळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितिन वाडेकर यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने केले, तर आभार प्रदर्शनाचे काम मनोज शिंदे यांनी पार पाडल
लॉकर सुविधा सुरू झाल्याने सभासदांनी सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी पतसंस्थेकडून मिळालेल्या सुविधेचा आनंद व्यक्त केला. अहिंसा पतसंस्थेचा हा उपक्रम आर्थिक सुरक्षा व विश्वासार्हतेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
अहिंसा पतसंस्थेच्या यशस्वी उपक्रमांची मालिका यापुढेही सुरू राहील, अशी अपेक्षा उपस्थित सभासदांनी व्यक्त केली.