जिहे कठापूर योजनेच्या शुभारंभाचा गवगवा कन्याकुमारी ते जम्मू काश्मिरपर्यंत केला जातोय कारण ही तसेच दमदार आहे, क्यूं की मोदींची गॅरंटी म्हणणारे देशाचे पंतप्रधान स्वयं मा.नरेंद्र मोदीजी यांचे हस्ते १९ फेब्रुवारी रोजी माण तालुक्यातील आंधळी धरणावरती जलपूजन संपन्न होत आहे. अशातच आंधळी धरणाच्या ८ ते १० किलोमीटर परिसरातील बिजवडी ,जाधववाडी,मोगराळे, तोंडले, पाचवड पांगरी हस्तनपूर या गावांना कोणताच लोकप्रतिनिधी कोणत्याच योजनेमध्ये व पाणी वाटपात या क्षणापर्यंत समाविष्ट करु शकला नाही. यामुळेच वरील गावांमधील हजारो जनमाणसांना व त्याच्या भावी पिढ्यांना दुष्काळात कायमस्वरुपी जगावे लागेल हे त्रिवार सत्य आहे.
आमदार गोरेसाहेबांच्या चांगल्या कामांचे राजकारणा पलीकडे जाऊन कौतुक करणे हे जनता म्हणून आमचे देखील कर्तव्य आहे आणी वेळप्रसंंगी ते जाहीर बोलून दाखवणारा व वेळप्रसंगी पाणीप्रश्नासाठी हिंदुरावांसोबत कळंबा जेल देखील भोगलेला मी कार्यकर्ता आहे.परंतु जनतेप्रति जबाबदारी समजून काही गोष्टी मांडणे म्हणजे विरोध नसून आपणांना जलनायक संबोधणार्या बिजवडी परिसरातील भाबड्या जनतेच्या कपाळावरील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी का होईना एकदाची तीसरी टर्म संपताना कोणाची तरी लेखी व जाहीर गॅरंटी द्याना आमदारसाहेब
१९९५ साली शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांचे रिमोट कंट्रोलवरील युतीचे सरकारने दुष्काळी तालुके व जनतेला नजरेसमोर ठेवत कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करत.लोकनेते मा.खासदार हिंदुरावजी ना. निंबाळकर यांचे आंदोलनाला यश देत उरमोडी, जिहे कठापूर, टेंभू,तारळी, या असंख्य योजना तात्काळ पैसे व मंजूरी देत संपूर्ण दुष्काळी माण,खटाव आटपाडी, व जत व ईतर दुष्काळी जनतेसाठी तक्तालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांनी या योजना क्षणात कार्यान्वित केल्या. एवढेच नव्हे तर ब्रिटीश कालीन आंधळी धरण पूर्णत्वास नेणारे देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचेच सरकार आहे.
परंतु १९९९ ला युतीचे सरकार गेले आणि तिथ पासून २०२४ आजपर्यंत गेली २५ वर्षे आंधळी धरणात पाणी यायला वेळ लागला याला सर्वजन जबाबदार आहेत. जनतेला भोग भोगायला लावणारे व वंचित ठेवणारे कोण कोण आहेत हे देखील तपासायला हवे. आज पाण्याचा आनदोत्सव करणारे आनदात विसरुण गेले नाहीत ना की, आजही बिजवडी परिसरासोबतच माण खटावमधील अर्ध शतकापुढेही जातील एवढ्या गावांमधील जनता कागदावरती देखील पाणी वाटपाला साधी स्पर्श करु शकलेली नाहीत.
पंतप्रधान मोदी साहेब येतायेत हा माण तालुक्यातील आशावादी जनतेसाठी नक्कीच आनंदाचा क्षण आहे व का नसावा परंतु आजही पाण्यापासून वंचित ठेवलेल्या हजारो जनतेच्या हक्काला न्याय देण्यासाठी निवडणूकीचा जुमला न करता लेखी गॅरटी मोदी देतायेत का? हे पाहणे खरे आनंदाचे व औत्सुक्साचे ठरेल असे सरतेशेवटी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी म्हटले आहे.