माण देशातील पर्यावरण प्रेमी शेतकरी ऊध्दव बाबर यांनी देवापुर येथे पडीक माळरानात पुर्णत: सेंद्रीय पध्दतीने जोपासलेल्या आंबा बागेतील केशर आंबा यंदाही परदेशात निर्यात करण्यात यश
व्हिजन २४ तास न्युज (संपादक ;अहमद मुल्ला )
म्हसवड ( दिलीपराज कीर्तने )
माण देशातील पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असलेले शेतकरी ऊध्दव बाबर यांनी देवापुर येथे पडीक माळरानात पुर्णत: सेंद्रीय पध्दतीने जोपासलेल्या आंबा बागेतील केशर आंबा यंदाही परदेशात निर्यात करण्यात यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
श्री बाबर यांना पाच वर्षापुर्वी दिड एकरात दिडशे केशर,बारमाही फळ देणारे हापुस, गुलाल्या व रायवळ जातीच्या कलमी रोपांची लागवड केली होती. यामध्ये केशर आंब्याची 120 झाडे असुन ती सुमारे दहा ते 12 फुटाहून अधिक उंच वाढली आहेत. पाणी टंचाईवर मात करुन सर्व झाडांना ठिबक सिंचन द्वारे पाणी देत त्यांनी हि बाग जोपासलेली आहे. आंबा रोपांची लागवड केल्यापासुन आज अखेर त्यांनी या फळबागेत रासायनिक खते व किटकनाशकाचा वापर पुर्णत: टाळून नैसर्गिक पध्दतीने बाग जोपासत गेली दोन वर्षे आंब्याचे पिक घेत आहेत.
गत वर्षातील फळ हंगामात निर्यातक्षम सर्व निर्कषाच्या चाचणीत केशर आंबा पात्र ठरल्याने दिडशे रुपये किलो दराने बागेतच व्यापा-यांनी खरेदी केली होती.
यंदाच्या हंगामात गत वर्षातील फळां पेक्षा अधिक क्षमतेने दर्जा वाढलेला निदर्शनास आल्याने यंदाही परदेशात विक्रीसाठी निर्यात करण्यास व्यापा-यांनी बागेतच आंबा खरेदी करण्यास पसंती दिली. पुर्णत: नैसर्गिक पध्दतीने आंबा बाग जोपासण्याची पध्दतीबाबत माहिती देताना श्री बाबर यांनी सांगीतले की आंबा हे फळ झाड जंगली आहे.आम्ही पुर्णत:नैसर्गिक पध्दतीनेच आंब्याची झाडे जोपासली आहेत. फळधारणा त्यानंतर फळाचा आकार व वजनात कमालीची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष बाब म्हणजे नैसर्गिक पध्दतीनेच पाड लागल्यानंतर तो पाला पाचोळ्याच्या आच्छादनात पिकविल्यानंतर फळाचा नैसर्गिक रंग व गोडवा व चवही वेगळीच अशी स्वादिष्ठ असल्याचे माझे अनुभवास आले आहे.याबरोबरच नैसर्गिक पघ्दतीने पिकलेला आंबा लवकर नासत सडत नाही हा खरा मोठा फायदा आहे.
जर रासायनिक कार्बाईडचा वापर करुन जलद गतीने पिकविलेल्या आंब्याचा रंग एकसारखा गडद व आकर्षक असा जरी दिसत असला तरी तो आरोग्यास हानीकारक असा आहे हा आंबा लवकर सडतो हा त्यातील फरक आहे.
मी व माझी पत्नी स्मिता बागेची वर्षभर निगा व देखरेख करीत असतो.वर्षभरात बाग संगोपन बाबत ते सांगतात बागेतील प्रत्येक झाडांना वाळलेले गवत,झाडांचा पाला पाचोळा,कुजलेले शेण तलावातील गाळाची माती एकत्रित मिश्रण करुन प्रत्येक रोपाच्या बुंध्याभोवती गोलआकार पसरुन ठिबक सिंचनचा वापर करुन पाणी देत आहोत. रासायनिक खताचा वापर बाग लागवड पासुनच टाळला आहे,झाडावर किटकनाशकाचा वापर केला नाही. प्रत्येक झाडाच्या बुध्या भोवती विविध कडधान्याबरेबरच देशी गायीचे गोमुत्राची स्लरी जिवामृत वर्षातून तीन वेळा दिले. झाडांना मोहर फुलोरा आल्यानंतर परागीभवनसाठी मध माशी व फुल पाखरुची भुमिका खुपच महत्वाची मानली जाते.
रासायनिक खता बरोबरच विषारी किटकनाशकाच्या वापराचा अतिरेक वाढल्यामुळे पर्यावरण संतुलनात बदल झाला परिणामी फुलपाखरांचा -हास झाला आज शेत मळ्यात शोधूनही फुलपाखरे दिसुन येत नाहीत. मधमाशीची याहून वेगळी स्थिती नाही म्हटले तरी चालेल तरीही उपलब्ध मधमाशीची बागेतील फळधारणासाठीची गरज पाहता या बागे लगतच पडीक जमिनीत गोदन, कवच,काजू,तुती,आवळा,चिकू,बोर,पेरु,आवळा,हादगा,नारळ,गोड व आंबट चिंच,सरस, अॅवाकोडा, सिताफळ,रामफळ,देशी केळी,जांभळ व जांबून,फॅशन फ्रुट,इत्यादी प्रकारची देशी विदेशी फळा-फुलांचीही लागवड केली व हि सर्व प्रकारची झाडे आम्ही पती पत्नीने जोपासल्यामुळे आंबा बागेत मध माशीचा वावर वाढू लागला याचा अचुक फायदा आंबा बागेस होत आहे.
शेतक-यांनी फळबागांचे संगोपन नैसर्गिक पध्दतीनेच करावे असे आवाहन आम्ही नेहमीच करीत असतो.